• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

जवां है मोहब्बत…

- समीर गायकवाड (#लव्ह बॉलिवुड)

Nitin Phanse by Nitin Phanse
November 24, 2022
in भाष्य
0

ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा आपला देश स्वतंत्रही झालेला नव्हता, तरीदेखील त्या काळी सिनेमे बनत होते. देशात एकीकडे इंग्रजांविरुद्ध अगदी निकराने स्वातंत्र्यचळवळीने जोर धरला होता, तरीही लोक सिनेमे बघत होते. १९४५नंतर ही लढाई निर्णायक टप्प्यात आली, तेव्हाही प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळत होता. याला कारण तत्कालीन सिनेमांची कसदार कथानके आणि आशय. जोडीला नावीन्यपूर्ण सादरीकरण. यामुळे त्या घनगंभीर परिस्थितीत देखील थिएटर हाऊसफुल्ल असत. तेव्हाचे काही सिनेमे आणि त्यातली गाणी आजदेखील लोकांच्या स्मरणात आहेत. हे कसे काय शक्य आहे? सिनेमा बघणारे जे तेव्हा तरुण असतील, म्हणजे १९२०च्या पुढचा जन्म असलेले, त्यातले किती लोक आज ह्यात असतील? १९३०च्या आसपास जन्मलेल्या प्रेक्षकांचे वय आज नव्वदीच्या आसपास असेल. पण आईवडीलसुद्धा तेव्हा जन्मले नसतील अशा आजच्या पंचविशीपासून साठीपर्यंतच्या चित्रपट रसिकांना ते सिनेमे वा त्यातली गाणी कशामुळे माहिती असतील? का बरं ही जुनी गाणी, जुने सिनेमे कालबाह्य होत नाहीत? त्या चित्रपटांतला गोडवा, निर्भेळ प्रेम, सच्च्या कथा, अवीट गोडीची गाणी आणि साधेपणा हे काही प्रमुख घटक या प्रश्नाचे उत्तर ठरू शकतात. तुम्हाला असं गाणं आठवतं का, जे १९४०च्या दशकात गायलं गेलं असलं तरी आजही कुठे रेडिओ, टीव्ही वा इंटरनेटवर ऐकताना–पाहताना आपण त्यात गुंतून जातो? मला तर खूप गाणी आणि सिनेमे आठवतात. त्यातही ‘अनमोल घडी’, ‘बडी बहन’, ‘रतन’, ‘बरसात’, ‘अंदाज’, ‘किस्मत’, ‘सिंदूर’, ‘आग’, ‘महल’, ‘मशाल’, ‘बाबुल’, ‘शहीद’, ‘झीनत’ असे सिनेमे आठवतात. यांची साधीसोपी मधाळ नावेच सगळं काही सांगून जातात. अगदी साध्या पण हृदयाला भिडणार्‍या कथा ही यांतली समानता.
हे सगळे सिनेमे कधी दूरदर्शनवर रविवारी संध्याकाळी सहा वाजता तर कधी शनिवारी दुपारी तीन वाजता पाहिलेले आहेत. ‘फिचर फिल्म अब से कुछ ही देर में’ असा फलक बर्‍याच वेळ डोळ्यांपुढे राहायचा. बहुतांश घरी असलेल्या ओबडधोबड कृष्णधवल टीव्ही संचावर हे सिनेमे पाहिले जायचे. चित्रपट देखील बहुतांशी कृष्णधवल असल्याने टीव्ही सेट रंगीत नसल्याचे फारसे दुःख नसायचे. कारण एरव्ही त्यावर ‘कोर्टाची पायरी’, ‘आमची माती आमची माणसे’ हेच चालू असायचे. नंतर यथावकाश सिनेमा सुरु व्हायचा; टीव्हीवरचा जाहिरातीचा राक्षस तेव्हा आताच्याइतका नरडीचा घोट घेत नसे, ही त्यातली जमेची बाजू. हे सर्व जुने सिनेमे काहीसे संथ वाटायचे, सावकाश बोलणारी नट मंडळी, नाचताना अगदी अदबीने नि अगदी मोजून मापून अंग हलवणार्‍या नट्या असा मामला असायचा. खलनायक मात्र अगदी दणकेबाज पहिलवानी अंगाचे वा राकट चेहर्‍याचेच! शिवाय ही सगळी पात्रे काहीसा हेल काढून संवाद म्हणायची. त्यामुळे त्या सिनेमापुढे फार तर अर्धा-एक तासच माझा निभाव लागायचा. पण समज आली तेव्हा मात्र हे सिनेमे समरसून बघितले आणि त्या सोनेरी काळाचा आनंद घेतला. अशोक कुमार आणि लीला चिटणीसचा ‘बंधन’ (१९४०) बघताना आजही मजा येते, मध्यंतरी ‘दिलवाले दुल्हनिया…’ ह्या शाहरुखच्या सिनेमाच्या विक्रमी स्क्रीनिंगबद्दल लिहिले जाई, पण त्याहीपेक्षा जबराट विक्रम त्या काळी अशोककुमारच्या ‘किस्मत’ने (१९४३) केला होता. तशा धामधुमीच्या काळातही हा सिनेमा सलग कोलकात्यात सहा वर्षे एकाच थिएटरला चार शोमध्ये झेंडा फडकावत होता. ‘रतन’मधली गाणी आजही ऐकावीशी वाटतात. अगदी नवतरुण असलेले दिलीपकुमार, राज कपूर यांचे ‘बरसात’, ‘आग’, ‘बाबुल’, ‘शहीद’, ‘अंदाज’ हे सिनेमे अजूनही मेंदूत पाऊलखुणा ठेवून आहेत.
त्या काळचे बहुतांश नट-नट्या हे स्वतःच गायक गायिका असत, ते स्वतःसाठी गात. छोटासाच तरीही सुरेल असा सूर-तालाचा आरोह अवरोह हेच आपलं जगणं मानणारा एकजिनसी वाद्यवृंद तेव्हाच्या संगीतकारांकडे असायचा. सुरेल गाणी आणि अर्थपूर्ण रचना या दोनेक शब्दांत त्या काळच्या गाण्यांची व्याख्या करता येते. या अशा जुन्या सिनेमांपैकी मला आवडतो ‘अनमोल घडी’. सुरैय्या, नूरजहां, सुरेंद्र हे सर्व गायक नट- नट्या यात प्रमुख भूमिकेत होत्या. प्रेमाचा त्रिकोण–चौकोन हा यातला कथा विषय होता. चंदर आणि लता ही जेहानाबादमध्ये राहणारी किशोरवयीन जोडी. लता ही एका श्रीमंत घरातली मुलगी तर चंद्रभान उर्फ चंदर हा एका गरीब, विधवा आईचा मुलगा. लताच्या पालकांना गरीब असलेल्या चंदरबरोबरची मैत्री आवडत नाही. काही दिवसांनी लताचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित होते. चंदर आणि लता दोघेही हिरमुसून जातात. लता जाताना आपली आठवण म्हणून तिचेच घड्याळ चंदरला भेट देते. काळ पुढे सरकत राहतो. गावात किरकोळ वाद्ये दुरुस्त्या करून देणारा तरुण चंदर (सुरेंद्र) पुढे कामाच्या शोधात लताचाही शोध घेऊ लागतो. कारण तो तिला अजिबात विसरलेला नसतो. प्रकाशच्या सांगण्यावरून तो पोटापाण्यासाठी मुंबईत येतो. प्रकाश (झहूर रझा) हा मूळचा त्याच्याच गावचा असलेला चंदरचा बालमित्र आता एक श्रीमंत व्यक्ती झालेला असतो, तो चंदरला मदत करतो. त्याला वाद्य दुरुस्तीचे दुकान सुरु करून देतो. प्रकाशच्या आईला (अमीर बानो) प्रकाशने चंदरवर पैसे खर्च केलेले आवडत नाही. तरीदेखील तो त्याला मदत करत राहतो. त्याला त्याच्या पायावर उभे राहता यावे यासाठी तो प्रयत्न करतो. इकडे तरुण लता (नूरजहां) एक लेखिका बनते. रेणू उर्फ ‘रेणुका देवी’ हे टोपणनाव ती धारण करते. काळ्याभोर लांबसडक केसांची, गोड गळ्याची चाफेकळी नाकाची नूरजहां फार खुलून दिसते. चंदर तिच्या लेखनाचा चाहता होतो. बसंती (सुरैय्या) ही लताची खास जिवाभावाची मैत्रीण असते. लता तिच्या एका कादंबरीत चंदर आणि स्वतःच्या बालपणावर आधारित कथा गुंफते. चंदर ती कादंबरी वाचतो आणि ही गोष्ट तिला कशी काय माहीत झाली याचे कुतूहल त्याच्या मनात जागे होते. तो रेणूला म्हणजे लतालाच त्यासाठी एक पत्र लिहितो, प्रत्यक्ष भेटण्याची विनंती करतो. या भेटीला रेणू तयार नसते, पण बसंती तिला तयार करते. त्यासाठी बसंती स्वतः रेणू बनून भेटायला जाते. पहिल्याच भेटीत ती त्याच्यावर भाळते, पण त्या भेटीत चंदरकडून लताने आठवण म्हणून दिलेले घड्याळ तिथेच राहून जाते. ते घड्याळ बसंती घेते आणि लताला दाखवते. लता ते घड्याळ ओळखते. तिला वाईट वाटते की आपण बालपणीच्या साथीदारांनी एकमेकाला ओळखले नाही. या सिच्युएशनला ‘मेरे बचपन के साथी..’ हे मस्त गाणे आहे. घड्याळ हरवल्यामुळे चंदर बेचैन होतो. बसंतीने घड्याळ परत दिल्यावर त्याच्या जिवात जीव येतो. त्याची ही स्थिती बसंती येऊन लताला सांगते. तिला आनंदही होतो आणि बसंतीचा त्याच्यावर जीव जडल्याने वाईट वाटते. या प्रसंगी ती खोटे खोटे हसून वेळ मारून नेते. याच प्रसंगी सुपरहिट ‘जवां है मोहब्बत हसीं है जमाना…’ हे अवीट गोडीचे गाणे आहे. ‘तुम्हारे लिए मोहब्बत बारीश की छिटपुट बुंदे हैं, मेरे लिये मुहब्बत घुट घुट के मर जाना है’ असं म्हणत लता दुखावलेल्या बसंतीच्या मार्गातून दूर होते. लताचे आईवडील प्रकाशसोबत तिचा विवाह ठरवतात. हा धक्का चंदर कसाबसा सहन करतो पण त्याची आई तो सहन करू शकत नाही, तिचा मृत्यू होतो. चौघांनाही सत्य कळून येते, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. लता आणि प्रकाशच्या लग्नात येऊन चंदर तिला लग्नाची भेट म्हणून तिने बालपणी दिलेले घड्याळ देतो. सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये सूर्यास्ताच्या वेळेस पाठमोरा चालत जाणारा चंदर आणि त्याच्या मागोमाग पळत जाणारी पाठमोरी बसंती दिसते. सिनेमात वेगळा वाटणारा शेवट केला आहे. हळवी कथा, दोन-तीन मिनिटांची छोटी छोटी पण मस्त गाणी, पार्श्वसंगीताचा कमीत कमी वापर, लो लाईट इफेक्ट्स, सर्वच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय व दमदार स्टारकास्ट यामुळे ‘अनमोल घडी’ने ऐतिहासिक यश मिळवले. मलिका-ए-तरन्नुम नूरजहां हिची कर्णमधुर गाणी हा या सिनेमाचा प्राण ठरावा इतकं यश या गाण्यांना मिळालं. किंचित किनर्‍या वाटणार्‍या या आवाजाचा आणि शैलीचा प्रभाव लताजींवर होता यातच सर्व काही येते. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या नूरजहांला भारतीय रसिकांनी आपल्या हृदयात दिलेले अढळ स्थान आजही कायम आहे. मेहबूबच्या परीसस्पर्शी दिग्दर्शनाने सजलेल्या ‘अनमोल घडी’मध्ये तन्वीर नक्वी यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गाण्यांना नौशादजींनी सुमधूर संगीत दिले आणि नूरजहांनी त्याच्या आधारे लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठले होते. ‘जवां है मोहब्बत हसीं है जमाना, लुटाया है दिल ने खुशी का खजाना…’ या गीताची जादू अजूनही कायम आहे!
संध्याकाळी देव्हार्‍यात लावल्या जाणार्‍या दिव्याचे पावित्र्य या काळातल्या सिनेमांत असायचे, सकाळची सडारांगोळी करून तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतानाची प्रसन्नता त्यात होती. दुपारच्या शीतल वामकुक्षीचा निवांतपणा त्यात असायचा. शहर झोपी गेल्यानंतर उत्तररात्री खिडकीतून येणारा गार वारा शृंगाराचे हळुवार गुंजन जोडप्यांच्या कानात करायचा, तो शृंगार या सिनेमांत होता. सप्तरसाचे मर्यादित पण उत्फुल्ल रसरशीत आविष्कार या सिनेमांत होते म्हणून ते अधिक जवळचे आणि अधिक सच्चे वाटायचे. माझा जन्मदेखील अनमोल घडीच्या आसपासच्या काळात झाला नव्हता, पण या चित्रपटावर मला लिहावेसे वाटले, कारण त्यातला आशय, मांडणी आणि ताजेपणा या तिन्ही गोष्टी. युट्यूबवरही हा चित्रपट आहे. काहींना तो स्लो वाटेल तर काहींना बोअर वाटेल, पण त्यातला आनंद घेऊन पाहायचे ठरवले, तर श्वेतशामल चित्रपटांच्या सोनेरी प्रारंभाचा देखणा काळ आपण अनुभवू शकतो. ‘अनमोल घडी’ने पंच्याहत्तरी पार केलीय, तरीदेखील सोशल मीडियाच्या हायटेक जमान्यात ‘अनमोल घडी’नंतर काही दशकांनी जन्माला आलेल्या माझ्यासारख्या रसिकाला त्यावर लिहावे वाटते आणि तुमच्यासारखे रसिक ते वाचतात आणि भरभरून प्रतिसाद देतात तेव्हा ती त्या भूतकाळच्या अनमोल ‘घडी’ला दिलेली प्रेमाची खरी पावती असते.
अशीच महती ‘सीमा’ची आहे. कृष्णधवल हिंदी सिनेमांच्या सुवर्ण इतिहासातले रुपेरी नाव म्हणजे ‘सीमा’. हाही माझा जेव्हा जन्मही झाला नव्हता, तेव्हाचाच सिनेमा. १९५५चा हा सिनेमा मी आवर्जून डीव्हीडी आणून घरी पाहिला, कारण यातील ‘तू प्यार का सागर है’ हे अजरामर गाणे! हे गाणे मी युट्यूबवर बर्‍याच वेळा पाहिले, ऐकले नि दरवेळेस अनामिक शांतता मनाला मिळत गेली. बालपणी जुनेर कपड्यात शेजार्‍यांच्या घरी जाऊन हा सिनेमा एका रविवारच्या सांजेस दूरदर्शनवर पाहिल्याचे आठवत होते. पण सिनेमा कथानकासह आठवत नव्हता. आज पाहू, उद्या पाहू करत करत बराच काळ निघून गेला. मध्यंतरी जावेद अख्तर यांच्या तोंडून ‘सीमा’बद्दल काही फिल्मी किस्से ऐकले आणि जिज्ञासा अधिक चाळवली. त्यामुळे अगदी आवर्जून ‘सीमा’ पाहिला.
बलराज साहनी आणि नूतन यांचा नितांत सहजसुंदर अभिनय. जोडीला मनाचा ठाव घेणारी, काळजाच्या कप्प्यात घर करून राहणारी पण साधी सरळ कथा. हे या सिनेमाचे वैशिष्ट्य. अत्यंत उमदे कथानक; पवित्र आणि मूक प्रेमाची मर्मस्पर्शी कथा आहे. एकापेक्षा एक कर्णमधुर गाणी म्हणजे दुधात साखर. नकळत डोळे ओले करून जाणारे शांत पण नादबद्ध संगीत हा या सिनेमाचा प्लस पॉइंट. या सर्वावर कडी म्हणजे आत्म्यासही तल्लीन व्हायला लावणारा मन्ना डे यांचा धीरगंभीर आवाज. एखादा ध्यानस्थ ऋषी अनामिक एकांत स्थळी जपमाळ ओढत बसलेला आहे अन् अंतर्धान पावलेल्या अवस्थेतही एक गूढ हुंकार त्याच्या मुखातून निघत असल्याचा भास मन्ना डेंना ऐकताना होतो. त्यांच्या ‘तू प्यार का सागर है…’मध्ये इतकी ताकद आहे की पहिल्यांदा ऐकणारा देखील दंग होऊन जातो! शैलेन्द्रने लिहिलेले ‘तू प्यार का सागर है’ हे गाणे प्रेमगीत नसून भजन आहे, असे काही समीक्षक सांगतात. मला तर ती विराणी वाटते. एका अनामिक ओढीने आतूर झालेल्या संयमित मनाच्या माणसाला, प्रतिभेला पंख लावून प्रेमाच्या दुनियेत फिरताना जाणवलेले दुःख प्रत्येक शब्दात व्यथा सांगून जाते.
चित्रपटाचे नावच ‘सीमा’ आहे. सीमा म्हणजे मर्यादा. जगण्याच्या प्रेमाच्या सीमा इथे समाजाच्या, मनाच्या कंगोर्‍यातून व्यक्त झाल्यात. साठच्या दशकातील या सिनेमात तत्कालीन आदर्शवादाला अभिप्रेत अशी राजहंसी देखणी पटकथा होती. आशय सांगायचा झाला तर गुरु आणि शिष्या यांच्या प्रेमाच्या रंगाला सामाजिक बंधनाची मर्यादा येते. अत्यंत अबोल, अगतिक आणि पवित्र असे हे प्रेम दोन मनांच्या आंतरिक मर्यादेत राहून सर्व सामाजिक बंधने स्वीकारून मनाच्या कोशातच राहते. गौरी ही अनाथ मुलगी काशिनाथ काकाच्या घरी काकूसोबत राहते. धुणी-भांडी करून काका-काकूचे घर चालवते. पण काकू तिला खूप त्रास देते. तिच्यावर डोळा ठेवणारा मवाली, ती वश होत नाही म्हणून तिच्यावर हाराच्या चोरीचा आळ आणवतो. पोलीस तिची रवानगी महिला सुधारगृहात करतात. गौरीला अन्यायाची चीड असते. ती सुधारगृहात देखील स्वतःला अबला आणि दयनीय, लाचार अवस्थेत पाहू शकत नाही. तिला कोणाचेही ऋण अन कोणाचेही अत्त्याचार सहन होत नाहीत. सुधारगृहाच्या चालकाला गौरी गुन्हेगार नसल्याची खात्री पटते. गौरी निरपराध असल्याचे सिद्ध झाल्यावर ते तिला आपल्या सहाय्यकाशी विवाह करण्याचा सल्ला देतात. ती सुधारगृहातून पळून जाते. खर्‍या गुन्हेगाराला, बांकेलालला शासन करते. त्यानंतर तिचे मन पुन्हा सुधारगृहाकडे ओढ घेते. पण यावेळेस प्रेम तिच्या मनात जागृत झालेलं असते. माणसाची अचूक पारख करणार्‍या सुधारगृहाच्या चालकातच तिला आपला जीवनसाथी दिसतो. चित्रपटाच्या शेवटी एक दृश्य असे आहे की नाजूक शरीरप्रकृतीचे हृदयविकारग्रस्त अशोक (बलराज साहनी) हातातली आधाराची काठी टाकून देतात आणि त्यांचा आधार होते गौरी (नूतन). विविध रूपकांद्वारे स्त्रीच्या सामाजिक जाणीवा अन् तिच्यावर समाजाने टाकलेली बंधने यावर मार्मिक भाष्य समोर येत राहते. एखाद्या तरल कवितेसारखा सिनेमा नजरेतून काळजात विरघळतो. अमेय चक्रवर्तीचे दिग्दर्शन नेटके आहे. एकापेक्षा एक संथ फ्रेम त्यांनी सिनेमात वापरल्या असूनही सिनेमाला गती आहे.
या सिनेमांच्या काळात न जन्मलेली पण आवर्जून असे सिनेमे अन् अशी गाणी पाहणारी अनेक माणसं भवताली दिसतात. कारण काही रत्ने, हिरे, माणके भूतकाळाच्या ढिगार्‍याखाली दडून पडलेली असली तरी त्यांच्या साह्याने आपला वर्तमान अन भविष्य सुकर होते हे नक्की! आपल्या वाडवडिलांनी देखील हा सिनेमा पाहिला असेल. त्यातल्या बलराज साहनीच्या जागी स्वतःला फील केले असेल अन नूतनच्या जागी त्यांची जी कोणी मनोनीत प्रियतमा होती, तिला पाहिले असेल. न जाणो त्यांनी देखील हे गाणं पाहताना डोळ्यावरचा चष्मा पुसण्याच्या निमित्ताने डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडा हलकेच पुसून घेतल्या असतील. साठच्या दशकातील जुने हिंदी सिनेमे म्हणजे आजीच्या बटव्यासारखे आहेत. त्यातला ऐवज संपतही नाही आणि सरतही नाही. त्यातली माया उततही नाही नि माततही नाही. हा सिनेमा केवळ भूतकाळात नेतो असे नव्हे तर गतकाळाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन समृद्ध करतो! ‘जवां है मोहब्बत’ चिरतरुण असण्यामागचं खरं कारण हेच तर आहे! यासाठी आपण बॉलिवुडवर नितांत प्रेम करतो!

Previous Post

मी इथे आहे, मी तिथे कसा जाऊ?

Next Post

चर्चा पे चर्चा !

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025
भाष्य

टिंग टिंग भास्कर

May 22, 2025
भाष्य

चायवाला का डरला?

May 22, 2025
भाष्य

महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

May 22, 2025
Next Post

चर्चा पे चर्चा !

पारा उतरला...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.