• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

अमरत्व लाभलेले आमरण उपोषण

- ज्ञानेश सोनार (इतिहास्य)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 24, 2023
in भाष्य
0

इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जवळपास दीडशे वर्षे अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी, राजे महाराजांनी आत्मबलिदान केले. सर्वसामान्य जनता हजारोंच्या संख्येने बळी गेली. स्वातंत्र्यसैनिकांनी शस्त्राला शस्त्रानेच उत्तर उत्तर द्यायची पराकाष्ठा केली, पण इंग्रजांचे बळ व कूटनीती सरस ठरत गेली. अर्थात या मंडळींनी इंग्रज सरकारला जेरीस नक्कीच आणले होते. यावर महात्मा गांधीजींनी रक्तपात टाळण्यासाठी अहिंसक मार्गाचा उपाय शोधून काढला. ते शस्त्र बंदूक, तलवारीपेक्षा जास्त धारदार निघाले. ते शस्त्र होते उपोषण आणि सत्याग्रह. गांधीजींची ही लढाई खूपच यशस्वी होत गेली. इंग्रजांकडे हजारो सैनिक होते, तर गांधीजींकडे लाखात भारतीय सर्वधर्मीय सामान्य जनता होती. मिठाचा सत्याग्रह, दांडीयात्रा यांसारख्या शस्त्रहीन आंदोलनांमध्ये लाखोंच्या संख्येने भारतीय जनतेचा सहभाग होता. किडकिडीत, काळी सावळी देहयष्टी लाभलेले गांधी इंग्रजांना आकाशाएवढे उंच भासू लागले. पण इंग्रजांनी जातीजातींत विष पेरायची संधी घेतली. भारत-पाक फाळणी करून हजारो सर्वसामान्यांच्या कत्तली घडवून आणल्या, पण निश्चल गांधीजींपुढे त्यांना मान तुकवून स्वातंत्र्य द्यावेच लागले. यावर डेव्हिल लो या ब्रिटिश व्यंगचित्रकाराने इंग्रजांना सणसणीत मुस्कटात लगावली. बाळासाहेब ठाकरे व आर. के. लक्ष्मण ज्या व्यक्तीला गुरु मानत, त्या डेव्हिड लो याने दुसर्‍या महायुद्धकाळात हिटलर, चर्चिल, स्टॅलिन यांना सळो की पळो करून सोडले होते. दुसरे चिरंजीव होते चार्ली चॅपलीन. यांनी हिटलरला तर ‘ग्रेट डिक्टेटर’ या सिनेमात भरपूर मुस्काटले होते… एक शब्दही न उच्चारता, नि:शस्त्रपणे. लाखोंची कत्तल करणारा हा नराधम डिक्टेटर या दोघांपुढे हतबुद्ध झाला. त्याच्या ‘हिट लिस्ट’वर डेव्हिड लोचे नाव प्रथम क्रमांकावर होते, इतका त्याचा क्रोध अनावर होता. इंग्रजांसाठी गांधीजींचे उपोषण, डेव्हिड लो यांच्या रेषा, आणि चार्ली चॅपलीनचा अभिनय ही अस्त्रे शस्त्रांपेक्षाही धारदार ठरली.
मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपली नेतेमंडळी गांधीजींचे उपोषण खेळण्यातल्या बंदुकीसारखे वापरू लागली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने सत्तेच्या वारुवर घट्ट मांड ठोकली. अनेक दिग्गज नेते आले आणि गेले, सत्ता फिरून फिरून त्यांच्याकडेच येत गेली. अनेक उच्चविद्याविभूषित नेतेमंडळी, स्वातंत्र्यासाठी खरा तुरुंगवास भोगणारी मंडळी विरोधी पक्षांतही होती. पण, काँग्रेसकडे त्यांची तगडी फौज होती. पंतप्रधान पं. नेहरू, राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, लाल बहादूर शास्त्री आदी केंद्रात तर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, मधुकरराव चौधरी, वसंत दादा पाटील, मोरारजी देसाई, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आदी. तर विरोधी पक्षीय म्हणून नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, मधु लिमये, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस, कॉम्रेड डांगे आदींची फळी होती. हे सर्व विरोधी नेते अभ्यासू, बुद्धिमान संयमित, सभ्यपणाने वावरणारे होते. समस्या मांडत होते, सभागृहाची प्रतिष्ठा जाणत होते. लाक्षणिक संप, उपोषणे, मोर्चे ही त्यांची हत्यार होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये हीच मंडळी व महाराष्ट्रातली सामान्य जनता मोठ्या ताकतीने मैदानात उतरली होती. त्यात आचार्य अत्रे अग्रभागी होते. त्यांनी मोरारजींना सळो की पळो करून सोडले. मोरारजीसारख्या हेकट मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकरवी मोर्चावर गोळ्या डागल्या. १०५ लोक शहीद झाले. दिल्लीत संयुक्त महाराष्ट्र समितीने प्रचंड मोठा मोर्चा घडवून आणला. मोरारजींनी माघार घेतली व मुंबई महाराष्ट्राला मिळाली. संयुक्त महाराष्ट्राचा कलश इंदिरा गांधींनी महाराष्ट्रात आणला होता.
नंतरच्या काळात संप व मोर्चे होत राहिले, मात्र उपोषण हा प्रकार बराच मागे पडला. कारण उपोषण करणारे बरेचदा भंपकच असत. प्रत्येक फलक आमरण उपोषणाचा असे व चार-पाच दिवसांत ते गुंडाळले जाई. कधी तडजोड होई, तर कधी उपोषणकर्ते संशयाचे धनी होत. काहींचे वजन वाढल्याचेही अनुभवास येई. त्यामुळे आमच्यासारख्या व्यंगचित्रकारांची चंगळ होई. ही पाहा सामाजिक समस्येवरील कलाटणीचित्रे… काही वर्षांपूर्वी कोल्ड्रिंक्स मानव जीवितास विषसमान आहेत, असा प्रचंड प्रचार सुरू झाला होता. पिकांवर शिंपडल्यास कीड मरते, असेही बोलले जायचे. चित्र असे, एकाने उपोषण सोडण्यासाठी नटीचा हट्ट धरला. नटीने हट्ट पुरा केला, पण कसा तो पाहा. एकाने उपोषणकर्त्यापुढेच भेळपुरीचा ठेला लावलाय… मीडिया नसेल तर उपोषण करण्यात काय अर्थ असेही सुनावण्यात आले… भुकेल्या उपोषणकर्त्यापुढे हिरोईनला जाण्यास बंदी करावी लागली, कारण भूक कोणतीही असू शकते. एकाची तरुण बायको म्हणते, ‘तुम्ही उपोषणाला गेलात की माझी मात्र अकारण उपासमार!’
एका विषयावर किती विविध अंगांनी विचार करता येतो त्याचे हे उदाहरण.
आधीच हौस त्यात पाऊस. परिणामी उपोषण या विषयाने मान टाकली. राज्यकर्तेही त्या विषयास फार मान देत नसत. किंवा दुर्लक्ष करत. मधला बराचसा काळ अंडरवर्ल्ड सामर्थ्य वाढल्याचा होता. खून, मारामार्‍या, बॉम्बस्फोट, यांचं उदंड पीक आलं. सत्तापालटाचे प्रकार वाढू लागले. असंतोष वाढू लागला. विरोधकांनी सरकारविरुद्ध कंबर कसून ते एकत्र आले. त्यातच इंदिराजींनी पंतप्रधान असताना इमर्जन्सी लावली. देश ढवळून निघाला. इंदिराजींची जुलमी राजवटीला लयास गेली, त्या पराभूत झाल्या. विरोधी पार्टीचे सरकार आले.
तो गोंधळ गेली २५-३० वर्ष अद्यापही चालूच आहे. भ्रष्टाचार तर कल्पनेबाहेर वाढत गेला. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे नावाच्या वामनमूर्तीचा उदय झाला. अडगळीत पडलेले उपोषणाचे शिवधनुष्य अण्णांनी पेललं. छोटी मोठी भ्रष्टाचार प्रकरणं, शेतकरी समस्या, आदी सामाजिक समस्यांवर बरीच उपोषणे त्यांनी केली. मात्र लोकपाल आयोगावर २०११ साली ते दिल्लीत आमरण उपोषणास बसले. एकहाती अण्णांच्या मागे सर्व देश उभा राहिला, ही एक अभूतपूर्व व इतिहासात नोंद करणारी गोष्ट ठरली. लोकपाल बिलाचा त्यांनी आग्रह धरला. पण या आंदोलनाचा प्रभाव अल्पकाळ टिकला. मधली पाच सात वर्षं सरकार त्यांना झुलवीत राहिले. आमरण उपोषणाचा प्रभाव हळूहळू कमी होत राहिला हे सत्य आहे. गांधीजी ते अण्णा हजारे हा एवढाच उपोषणाचा तूर्त तरी प्रवास वाटतो.
आताशा त्याची जागा विराट आणि भव्य मोर्चांनी घेतली आहे. मात्र शक्तिप्रदर्शनाशिवाय त्यातून विशेष काही हाती लागले नाही. पुढे पुढे चाललेल्या काळाच्या ओघात अशा अनेक गोष्टी मागे पडतात तर कालपरत्वे नव्याने निर्माण होत राहतात.

Previous Post

जगातल्या पहिल्या शूज लाँड्रीचा मराठी जनक

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025
भाष्य

टिंग टिंग भास्कर

May 22, 2025
भाष्य

चायवाला का डरला?

May 22, 2025
भाष्य

महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

May 22, 2025
Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

शिवसेनेत प्रथमच कार्यकारी मंडळाची स्थापना

शिवसेनेत प्रथमच कार्यकारी मंडळाची स्थापना

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.