• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

जनमन की बात

सोशल मीडियावरचे जनमानस

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 7, 2022
in गर्जा महाराष्ट्र
0

नवलकरांचे अविस्मरणीय किस्से

शिवसेनाप्रमुखांच्या दरबारात अशी काही एक रत्नं होती तशी कोणत्याच पक्षात नव्हती. अर्थात शिवसेना हे एक कुटुंब होता होता राजकीय पक्ष बनला. त्यात कै. आमदार प्रमोद नवलकर हे नाव फार गाजलेलं. मी दर आठवड्याला `मार्मिक’ची चातकासारखी वाट पाहत बसे. कारण… भटक्यांची भ्रमंती वाचनासाठी. त्यातील एक एक किस्से अविस्मरणीय आहेत. २६ मार्चच्या अंकात फोटोग्राफर घनश्याम भडेकर यांचा शूटआऊट सदरातील लेख वाचला. प्रमोद नवलकर यांच्यावर शोधपथकाची नजर असायचीच. बिनधास्त, मोकळेपणाने अहोरात्र पर्यटन करणारा हा मनुष्य कधीही उठून चालू लागे आणि समुद्रकिनारी चांदतारे मोजत बसे. असेच एका रात्री उठले, गाडी काढली आणि निर्मनुष्य समुद्रकिनारी वाळवंटात गेले. त्यांच्यामागे हळूहळू, दबकत दबकत शोधपथकही गेले. कारण… आज काहीतरी घबाड हाती लागणार या उद्देशाने रात्रीचे एक ते दोनपासून पहाटेपर्यंत प्रमोद नवलकर आणि लपून बसलेले शोधपथक वाट पाहून थकले आणि अचानक पहाटे पाच वाजता नवलकरजी घरी निघाले. तेव्हा शोधपथकाचे अधिकारी आले आणि प्रमोद नवलकरांना विचारते झाले, काही चुकीची माहिती निघाली होती काय? तेव्हा नवलकर म्हणाले काही नाही, सहज आलो होतो. शोधपथक कपाळावर हात मारत परत फिरले. काय सांगू तुम्हास असे बरेच किस्से आहेत. वेषांतर करून फोरास रोडवरील जीवन बॅ. अंतुले मुख्यमंत्री यांना दाखविणारे प्रमोद नवलकरच, आरटीओमधील धाड याला कारणीभूतही प्रमोद नवलकरच. `जाता जाता’ एक सांगता, वैâ. माननीय बॅ. अंतुले यांच्या घरी कोकणात गणपती बसवत, होम-हवन होत असे.

रमेश ब. होले, पुणे

—-

कामेरकरांच्या लेखणीची किमया

‘मार्मिक’ अंकातील सर्व लेखन आणि संपादकीय चांगले आहे. ‘धंदा म्हणजे काय रे भाऊ’ सदरातील दिलीप पाथरे यांचा जीवनपट आवडला. विपरीत परिस्थितीत सुध्दा मेहनतीने आणि ध्येयाने उद्योग व्यवसायात कशी प्रगती करता येते याचे उत्तम उदाहरण या सदरातून पाहायला मिळते आहे. संदेश कामेरकरांच्या सिद्धहस्त लेखणीची ही किमया आहे. निव्वळ प्रगतीचे चित्र रेखाटण्याऐवजी त्यासोबत त्यामागची पार्श्वभूमी, जिद्द आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धंद्यातील खाचाखोचा सुद्धा ते उलगडून दाखवितात. यामुळे आमच्यासारख्या होतकरू तरूण व्यावसायिकांना नक्कीच योग्य मार्गदर्शन मिळतं. माहिती तंत्रज्ञान, इ कॉमर्स क्षेत्रातील तात्कालिक ‘युनिकॉर्न’ क्रांतीपेक्षा रोजगाराभिमुख नवोन्मेषी उद्योगधंद्यांना आणि त्यामागील व्यक्तींना मनापासून सलाम!

– नकुल चुरी

—-

तपासयंत्रणांच्या गैरवापरामुळे लोकशाही धोक्यात

सीबीआयच्या ढासळत्या विश्वासार्हतेबद्दल सरन्यायाधीश रमण यांनी चिंता व्यक्त केली आहे. सीबीआय, ईडी, सीरियस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस यासारख्या तपास यंत्रणा एकाच छत्राखाली आणण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आजकाल सर्व यंत्रणांचा गैरवापर होतो आहे, हेच त्यांनी सूचित केले आहे. पूर्वी चुका झाल्याच, परंतु आजचे आव्हान अधिक गंभीर आहे आणि म्हणूनच सरन्यायाधीशांनी निर्भयतेने हा आवाज उठवला, याबद्दल त्यांचे कौतुक करतानाच, समाजातील सर्व जणांनी तपासयंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना संपवू पाहणार्‍या प्रवृत्तींचा आपापल्या परीने विरोध केला पाहिजे. अन्यथा परिस्थिती आणखीनच गंभीर होईल!

– हेमंत देसाई

—-

शिवसेनेच्या अचिव्हमेंटची जाहिरात करायला शिका

जगातल्या कुठल्या शहरात एसी बस प्रवास इतका स्वस्त आहे? आज या तीव्र उन्हाळ्यात फक्त सहा रुपयांत मुंबईकर एसी बसने फिरू शकतो. घरापासून स्टेशनपर्यंत जाऊ शकतो. ही गोष्ट त्या प्रवास करणार्‍या माणसाच्या बायकोला माहितेय का? मुलांना माहितीय का? आईवडिलांना माहितेय का? नक्कीच माहित नसणार. करोनाकाळापासून ते आतापर्यंत… पेट्रोल डिझेल गॅसचे भाव गगनाला भिडण्याचे नवनवे रेकॉर्डस् बनत असताना… ट्रेन्स बंद असताना, प्रायव्हेट कॅब अ‍ॅपवाले ग्राहकांची लूटमार करत असताना, सामान्य माणसाचे ऑफिसला जाण्याचे वांधे असताना… उद्धव ठाकरेंनी एसी बसेसची संख्या वाढवत मध्यमवर्गीयांना पाचेक किलोमीटरचा प्रवास अगदी सहा रुपयांत करून दिला.ही खूप मोठ्ठी अचिव्हमेंट आहे. सगळीकडे मृत्यूचं थैमान चालू असतानासुद्धा बीएमसीचे कर्मचारी स्वतःचे जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचवत होते. लोकांना मरायला सोडून त्यांचे मृत्यू इतर कारणांनी झाले असं दाखवण्याचा इतर राज्यांसारखा पळपुटेपणा त्यांनी केला नाही. हीसुद्धा खूप मोठ्ठी अचिव्हमेंट आहे.
आज मुंबईतील गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांना शिवसेनेचा आधार आहे. कसलीही कामं अडली तरी माणूस हक्काने जवळच्या शाखेत जाऊ शकतो. अजून कुठल्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात जाऊन कामं झालेली मी ऐकली नाहीत. उद्या शिवसेनेच्या हातून सत्ता गेली तर या लोकांना कोण विचारणार नाही. या आणि अशा ज्या काही शिवसेनेच्या यूएसपी आहेत, त्या लोकांसमोर मार्केट करण्यात सेना कमी पडतेय. समोरची पार्टी काम दोन रुपयाचं केलं तर दोन हजारचं केल्यासारखं प्रचार करते. आणि इथं काम करूनसुद्धा त्याचं श्रेय तुम्हाला घेता येत नसेल तर ते तुमचं अपयश आहे. आणि ते तुम्ही नाकारू शकत नाहीत. चांगलं वक्तृत्व असणार्‍या तरुण आणि शिकलेल्या नेत्यांची फळी उभारण्यात तुम्ही कमी पडलात. इतर कोण नसेल तर आदित्य ठाकरेंची भाषणं तरी मार्केट करा. काहीतरी कंस्ट्रक्टिव्ह प्रचार करा.

– सुनील अकेरकर

Previous Post

सरकारी संताची जळजळ!

Next Post

होमरूल आणि शॉर्टहँड

Next Post

होमरूल आणि शॉर्टहँड

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.