• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 14 मार्चपर्यंत बंद राहणार- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 28, 2021
in घडामोडी
0
दहावी, बारावी परीक्षा, मूल्यमापनाचे अधिकार शाळांना द्या! शाळा, मुख्याध्यापक संघटनांची मागणी

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वी पुणे जिल्ह्यात देण्यात आलेले आदेश 14 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने शाळा, महाविदयालये, सर्व खासगी क्लासेस व इतर शाळा 01 मार्च 2021 ते 14 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.

साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यात कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु, पुणे जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविदयालये, सर्व खासगी क्लासेस व इतर शाळा 14 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात येत आहेत, मात्र ऑनलाईन पद्धतीने शाळा, महाविदयालये, सर्व खासगी क्लासेस व इतर शाळा सुरु राहतील तसेच पुणे जिल्ह्यात 10 वी व 12 वीच्या विदयार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

नियोजित परिक्षा आवश्यक असल्यास कोरोना-19 विषाणूच्या उपाययोजनांचे पालन करुन घेण्यात याव्यात. शक्यतो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा, 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व कायद्यातील इतर नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी 28 फेब्रुवारी 2021 पासून तत्काळ लागू करण्यात येत असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

 

सौजन्य : दैनिक सामना

Previous Post

निष्पक्ष चौकसीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

शाहरूखचा ‘पठाण’ येणार पुढच्या वर्षी

Next Post
शाहरूखचा ‘पठाण’ येणार पुढच्या वर्षी

शाहरूखचा ‘पठाण’ येणार पुढच्या वर्षी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.