• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

स्पर्धा करा, पण महाराष्ट्रातून ओढूनताणून काही नेऊ देणार नाही हे लक्षात ठेवा!

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 2, 2020
in घडामोडी
0
स्पर्धा करा, पण महाराष्ट्रातून ओढूनताणून काही नेऊ देणार नाही हे लक्षात ठेवा!

महाराष्ट्रात काहीजण येत आहेत, पण त्यांना महाराष्ट्राची ‘मॅग्नेटिक’ ताकद काय आहे हे माहीत नाही. त्यामुळे इथले उद्योग त्यांच्याकडे जाणे दूरच राहिले. उलट त्यांच्याकडूनच आपल्याकडे उद्योग येतील. दुसरा कोणी पुढे जात असेल तर त्याबद्दल असुया नक्कीच नाही. स्पर्धा करा आणि पुढे जा! पण ओढूनताणून जर कोणी काही घेऊन जात असेल तर ते आम्ही नेऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बजावले.

‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित उद्योजकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी ‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ पुढाकार घेत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्र हे एक वेगळे राज्य आहे. त्याला एक वेगळी संस्पृती आहे, संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाहीत, असे सांगतानाच अन्य राज्यातील उद्योग महाराष्ट्रात येतील असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी ‘मिशन एंगेज’ या पुस्तिकेचे तसेच ‘डिजिटल आर्ट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते.

उद्योजकांनो, तुम्हीच महाराष्ट्राचे उद्योग दूत व्हा!

महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येते आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे 113 वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बॅसिडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा तुम्हीच इतरांना सांगू शकता. वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्रात उद्योग करूनही आम्हाला कोणतीही अडचण आलेली नाही. कोणतीही समस्या आली तरी सरकार नेहमी आमच्यासोबत असते, म्हणून आम्ही महाराष्ट्राला सोडू इच्छित नाही हे तुम्ही सांगायला हवे. यामुळे महाराष्ट्रात देशभरातून नव्हे परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे दूत व्हा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना केले.

कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठी संधी – उद्योगमंत्री सुभाष देसाई

कृषी आणि आरोग्य क्षेत्रात उद्योगाच्या मोठया संधी निर्माण झाल्या असून इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्ससारख्या संस्थेने यात पुढाकार घेतल्यास शेतकऱयांनाही याचा फायदा होईल. जागतिक स्तरावर आरोग्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रातही मोठी संधी निर्माण झाली आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्सतर्फे सुरू करण्यात आलेले ‘एंगेज महाराष्ट्र’ हे अभियान यशस्वी होईल. यासाठी लागणारे सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.

सर्वसामान्यांसाठी रोजगार निर्मिती व्हायला हवी

महाराष्ट्राचा विकास करताना केवळ मशीनच्या माध्यमातूनच विकास होईल असे नाही. तर गुंतवणूक अशी व्हायला हवी ज्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटायला हवा. त्यांच्या घरातील चूल पेटायला हवी. तेव्हाच उत्पादकांना चांगली बाजारपेठ आणि ग्राहक मिळू शकतील, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केल्या.

कोविडचे संकट अजूनही संपलेले नाही. पण या संकटातही पुढे कसे जायचे याचा आपण मार्ग शोधतो आहोत. चेंबरशी संलग्न आपण सर्व हे महाराष्ट्राच्या परिवाराचा भाग आहात. त्यामुळे परिवारातील आपल्या दोघांचेही उद्दिष्ट एक आहे. यातून आपल्याला राज्याला पुढे न्यायचे आहे.

अडचणीचा काळ सुरू आहे. पण या काळात नोटाबंदीत जसा पैसा गायब झाला तसा गायब झाला नाही. आता चक्र फिरू लागले आहे. त्यामुळे आता आत्मविश्वासाने पुढे जाऊया. त्यासाठी आम्ही ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’सारख्या संकल्पना राबवित आहोत. त्यामध्ये तुम्हा उद्योजकांकडून आणखी सूचना याव्यात. नवीन काही करू शकतो का, त्याबाबत संकल्पना मांडण्यात याव्यात.

कोरोनासारख्या अडचणीच्या काळातही महाराष्ट्राकडून जगापुढे आगळा आदर्श ठेवला जाईल. यात तुमच्या सोबत सरकार पूर्ण ताकदीने राहील. महाराष्ट्र बलवान आहेच. त्याला आपण एकत्र येऊन आणखी बलवान करूया.

एक लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्रात येतील

परवाना पद्धती सुलभ व्हावी यासाठी एक खिडकी पद्धत राबवत आहोत. आतापर्यंत आपण 60 हजार कोटींचे सामंजस्य करार केले. जूनमध्ये झालेल्या या करारांनुसार संबंधित उद्योजकांचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी लक्ष घातले जात आहे. पुढील काळात एक लाख कोटीहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

सौजन्य- सामना

Tags: uddhav thackeray
Previous Post

कोविशिल्ड कोरोना लस सुरक्षितच! स्वयंसेवकाने केलेले विपरीत परिणामांचे आरोप सिरमने फेटाळले

Next Post

कोकण किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन, चक्रीवादळात भरकटलेले सीगल अखेर किनाऱ्याला

Next Post
कोकण किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन, चक्रीवादळात भरकटलेले सीगल अखेर किनाऱ्याला

कोकण किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन, चक्रीवादळात भरकटलेले सीगल अखेर किनाऱ्याला

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.