भारत -पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर तिन्ही सेनादलांच्या कारवाईची अचूक माहिती वेळोवेळी भारतीय प्रसारमाध्यमांना देणार्या धाडसी कर्नल सोफिया कुरेशी यांची कामगिरी कोणताही देशप्रेमी नागरिक कधीच विसरणार नाही. लष्करी अधिकार्यांचा देश हाच धर्म असतो हे न समजणारी आणि भाजपाने पोसलेली अनेक अपशकुनी मुस्लीमद्वेष्टी काळी मांजरे सद्यपरिस्थितीचा विचार न करता देशहिताला नेहमी आडवी जात असतात. मध्य प्रदेशच्या भाजप मंत्रिमंडळातील आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना, केवळ त्या धर्माने मुस्लीम आहेत म्हणून त्यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांची बहीण ठरवून जी अत्यंत अभद्र आणि किळसवाण्या भाषेत टिप्पणी केली त्यामुळे माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या संतापला यात नवल नाही. पोक्यानेही त्या शाहची आयमाय काढून त्याला शिव्यांची लाखोली वाहून संतापाला वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला, हा माणूस नसून हैवान आहे आणि पाकिस्तानी अतिरेक्यांइतकाच क्रूर आहे. यालाच ताबडतोब नेस्तनाबूत करण्याची ऑर्डर भाजपा नेतृत्त्वाने भारतीय सैन्याला द्यायला हवी होती, पण भाजपाचे हे सगळे वरिष्ठ नेते शेपूट घालून बसले आणि आपले कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही हे समजून त्याने बिनशर्त माफी मागण्यासही नकार दिला. देशभक्तीच्या नावाने गळा काढणारे आणि जगाला आपली भूमिका समजावून सांगण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवू पाहणारे हे भाजप नेते शाहसारख्या एका विघ्नसंतोषी चिल्लर मंत्र्याच्या हकालपट्टीची घोषणा का करत नाहीत, असा प्रश्न पोक्याला पडला. तेव्हा याबाबतीत तूच काही मंत्र्यांच्या प्रतिक्रिया घेऊन ये, असा सल्ला मी त्याला दिला. त्याच या प्रतिक्रिया.
पंतप्रधान मोदी : भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र है। विचार-स्वातंत्र्य इसका एक अत्यंत महत्त्वपूर्ण अंग है। अगर किसी भी भारतीय नागरिक ने अपने विचारों का आविष्कार किया तो उसमें गलत क्या है? इसका पैâसला स्थानीय कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट करेगी। इसमें हम हस्तक्षेप नहीं करते। तुम लोग बोलते हो कि ये विचार नहीं अविचार स्वातंत्र्य है, इसलिए कोई भी आदमी उसे जो बोलना नहीं चाहिए, वो बोलता है ये भी सच है। मगर इसका पैâसला भी हम नहीं कोर्ट करेगा।
अमित शहा : मध्य प्रदेश भाजपा का हार्ट है। वो कभी भी फेल नहीं होने देंगे। चाहे कितनी भी कीमत चुकानी हो। अगले विधानसभा चुनाव में मध्य प्रदेश में भाजप के सभी उम्मीदवार एकेक लाख मतों की बढत से चुनके आएंगे। मध्य प्रदेश के हमारे सभी मंत्रीगण सक्षम और कार्यकुशल हैं। भाजप के विचारों का अजेंडा कंधे पर लेकर उनकी प्रोग्रेस शुरू है। इसमें हम बाधा नहीं डालेंगे। जहां जहां विधानसभा इलेक्शन है, भाजपा पहले से अधिक आमदारों के साथ उभर आएगी।
नितीन गडकरी : या विषयावर मी माझी वैयक्तिक प्रतिक्रिया देईन, जिचा पक्षाच्या धोरणाशी काहीही संबंध नाही. मात्र ती तुम्ही कुठेही व्हायरल करणार नाही या अटीवर. हा जो कोण शाह नावाचा मंत्री आहे, त्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दलचे हीन, गलिच्छ, किळसवाणे वक्तव्य ऐकून कधी नव्हे ती माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी पंतप्रधान असतो तर अशा विकृत माणसाची हकालपट्टीच नव्हे, तर त्याच्यावर देशद्रोहाचा खटला सरकारतर्पेâ गुदरला असता. अशा किड्यांना वेळीच ठेचले पाहिजे. अशा लोकांमुळे पक्षाची प्रतिमा बिघडते याचे भान या मूर्खांना नाही. मुस्लीमद्वेष हा संघाचा विचार कधीच नव्हता. भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनीही अशा प्रकारच्या माथेफिरू भाजपवाल्यांवर कोणाचीही पर्वा न करता कडक टीका केली पाहिजे. पण जिथे पक्षाचे वरिष्ठ नेतेच अळीमिळी गुपचिळी करून बसतात तिथे माझ्यासारख्यांनी आवाज केला तर आमचाही वचपा काढायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. त्यापेक्षा मौनम् सर्वार्थ साधनम्. मी चुकून माकून पंतप्रधान झालो तर अशा प्रवृत्ती पक्षात काय देशातही वाढू देणार नाही. सध्या सत्तातुरांची चलती आहे. अशा प्रश्नांसाठी वेळ देण्याची कुणाचीही तयारी नाही. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे.
देवेंद्र फडणवीस : ही बाब माझ्या कक्षेत येत नाही. ज्यांच्या कक्षेत येते ते पाहतील. माननीय पंतप्रधान मोदीजी, आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी हे पक्षाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आहेत. पक्षाची प्रतिमा उजळ करण्यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत सुरू असतात. प्रत्येक गोष्टीचा ते सर्व बाजूंनी विचार करतात. त्यांना सल्ला देण्याइतका किंवा पक्षाच्या दृष्टीने वादग्रस्त असलेल्या प्रश्नावर मत व्यक्त करण्याइतका मी मोठा नाही. खरे तर मोदीसाहेब आणि शहासाहेब यांच्यामुळेच मी या मुख्यमंत्रीपदावर आहे. त्यामुळे या प्रकरणात मला गुंतवू नका. सॉरी.
सुरेश धस : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांबद्दल बोलायला यांची जीभ धजावत नाही. उलट वाल्मिक कराडला मदत करणार्या मंत्र्याला वाचवण्यासाठी जे आपली ताकद पणाला लावतात, असे कचखाऊ भाजप नेते त्या वीरांगनेबद्दल बीभत्स बोलणार्या शाहविरुद्ध काही बोलतील ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे.
अजित पवार : त्या मध्य प्रदेशच्या ‘शाह’ प्रकरणाबद्दल मला काकांचा सल्ला घेऊन योग्य तेच बोलावे लागेल. काही गोष्टी मनात असूनसुद्धा मनाप्रमाणे बोलता येत नाहीत. शेवटी माझ्या नाकावर टिच्चून ते भुजबळ आलेच ना! शेवटी कर्ता करविता वेगळाच असतो. ‘शाह’ प्रकरणाचे वाचाबंदी गूढ त्यातच लपले आहे.