• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कायदा मागे घेतल्याशिवाय ‘घरवापसी’ नाही! शेतकरी संघटना ठाम; आजची चर्चाही निष्फळ

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 4, 2021
in घडामोडी
0
कायदा मागे घेतल्याशिवाय ‘घरवापसी’ नाही! शेतकरी संघटना ठाम; आजची चर्चाही निष्फळ

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी आज पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आठव्यांदा बैठक झाली. दिल्लीतील विज्ञात भवनात झालेली ही बैठक देखील निष्फळ ठरली आहे. आता 8 जानेवारीला पुन्हा एकदा शेतकरी नेते आणि सरकारमध्ये चर्चेची फेरी होईल.

शेतकरी नेते कायदे मागे घेण्याच्या अटीवर ठाम आहेत. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय ‘घरवापसी’ होणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मांडली. बैठक संपल्यानंतर ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच आता पुन्हा 8 जानेवारीला सरकारसोबत चर्चा होईल आणि कायदे मागे घेण्याबाबत व एमएसपी या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

सरकारी जेवण नाकारले

बैठकीला उपस्थित असलेल्या शेतकरी नेत्यांनी सरकारी जेवण नाकारले. शेतकऱ्यांनी विज्ञान भवनातच लंगर लगावला. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय उद्योग व वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश यांना स्पष्ट शब्दात तुमच्यासोबत जेवणार नसल्याचे कळवले. तुम्ही तुमचे जेवण करा, आम्ही आमचे करू अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी घेतली.

मृतांना वाहिली श्रद्धांजली

दरम्यान, सोमवारी सरकार आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांमधील बैठक दुपारी अडीच वाजता सुरू झाली. बैठकीच्या सुरुवातीला सर्व मंत्र्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना दोन मिनिटं मौन राहत श्रद्धांजली वाहिली. यानंतर बैठक सुरू झाली.

54 शेतकऱ्यांचा मृत्यू

दिल्लीत हाडे गोठवणारी थंडी आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊसही कोसळतोय. पण तरीही शहरांच्या सीमांवर शेतकरी आंदोलनाची धग कायम आहे. कडाक्याच्या थंडीत रविवारी एका 18 वर्षीय तरुण शेतकऱ्यासह चार जणांचा मृत्यू झाला. गेल्या 39 दिवसांत तब्बल 54 आंदोलक शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार, पण शिवराज सरकारची डोकेदुखी कायम; काँग्रेसकडून भाजपवर टीका

Next Post

सूरतमध्ये बुलेटप्रुफ जॅकेटच्या कंपनीत कामाला होता नक्षलवादी; पोलिसांनी केली अटक

Next Post
सूरतमध्ये बुलेटप्रुफ जॅकेटच्या कंपनीत कामाला होता नक्षलवादी; पोलिसांनी केली अटक

सूरतमध्ये बुलेटप्रुफ जॅकेटच्या कंपनीत कामाला होता नक्षलवादी; पोलिसांनी केली अटक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.