• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कावळा, कबुतरांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांमुळे बर्ड फ्लूचा धोका नाही!

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 13, 2021
in घडामोडी
0
कावळा, कबुतरांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांमुळे बर्ड फ्लूचा धोका नाही!

कावळा, कबुतरे यासारख्या स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपासून बर्ड फ्लू पसरण्याचा किंवा माणसाला होण्याचा अजिबात धोका नाही. हे पक्षी एकाच ठिकाणी थांबत नाहीत.  मात्र, एकाच ठिकाणी असणाऱ्या किंवा थांबणाऱ्या पोल्ट्रीसाठी वापर होणाऱ्या पक्ष्यांना हा फ्लू मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे पालिका सतर्प असून जारी केलेल्या नियमांचे पालन करा, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संध्याकाळी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोणत्या उपाययोजना करायच्या आणि कोणती काळजी घ्यावी याबाबत चर्चा करून पशुवैद्यकीय आयुक्त आणि पालिकेच्या बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त या दोन अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागानेही रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केली असून यात दोन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार मृत पक्ष्यांची विल्हेवाट खड्डय़ांमध्ये पुरून विल्हेवाट लावली जाईल. त्यांना खड्डय़ांत पुरण्यासाठी चुनखडीचा वापर करण्यात येणार आहे. खड्डा भटक्या प्राण्यांमार्फत उकरला जाणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.

स्वच्छता हाच उपाय

मुंबईत कबुतरे आणि कबुतरखाने मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र, पोल्ट्री पक्षी म्हणजे काsंबडय़ा सोडून इतर कोणत्याही पक्ष्यात हा रोग मोठय़ा संख्येने पसरत नाही. तरीही पक्षी घरातील असो  की घराबाहेरचे ते राहत असलेली ठिकाणे ही स्वच्छ ठेवलीच पाहिजे, पिंजरे स्वच्छ ठेवलेच पाहिजे, स्वच्छता हाच यावरचा उपाय आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज

रस्त्यावर कोणताही पक्षी मरून पडला असेल तर त्याला हात लावू नये. असा पक्षी आढळल्यास पालिकेच्या 1916 या हेल्पलाइनवर संपर्प करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. अशा तक्रारी निवारणासाठी आप्तकालीन विभाग,  अथवा वॉर रुममार्फत कार्यवाही केली जाईल. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक अभियंताच्या आदेशानुसार कर्मचारी आणि कामगार मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावतील.

दिवसभरात आज 70 तक्रारी 

मुंबई महापालिकेच्या अहवालानंतर पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या 1916 या हेल्पलाईनवर आज दिवसभरात कावळे मेल्याच्या 70 तक्रारी आल्या. त्यामुळे पालिका प्रशासन अधिक सतर्प झाले आहे.  शीव, माटुंगा, वडाळा, पुलाबा, अंधेरी, बोरिवली, कांदिवली यासह मुंबईच्या विविध भागातून लोकांनी तक्रारी केल्या. यात 95 टक्के तक्रारी कावळे मेल्याच्या तर 5 टक्के तक्रारी या कबुतरे मेल्याच्या आल्या, अशी माहिती पालिका आपत्कालीन विभागाने दिली.

सौजन्य : दैनिक सामना

Previous Post

लसस्वी भव!! ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करत ‘कोविशिल्ड’ देशभरात रवाना

Next Post

लग्नाच्या अवघ्या एक महिन्यात पत्नीला धावत्या ट्रेनमधून ढकलले, महिलेचा जागीच मृत्यू

Next Post
लग्नाच्या अवघ्या एक महिन्यात पत्नीला धावत्या ट्रेनमधून ढकलले, महिलेचा जागीच मृत्यू

लग्नाच्या अवघ्या एक महिन्यात पत्नीला धावत्या ट्रेनमधून ढकलले, महिलेचा जागीच मृत्यू

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.