जंग जंग पछाडून सच्चा शिवसैनिक आणि मुंबईकर मतदार भक्कमपणे खर्या शिवसेनेच्या मागे उभे आहेत, हे पाहिल्यावर भारतीय जनता पक्ष आणि खोकेबाज, गद्दार मिंध्यांची रडगाणी सुरू झाली आहेत… शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं होऽऽ, उद्धव यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून बाळासाहेबांच्या आत्म्याला दु:ख पोहोचवलं होऽऽ… उद्धव यांनी बाळासाहेबांच्या मुलाला नकली संतान म्हणणार्या नकली हिंदुत्वाच्या कंबरड्यात लाथ घातली आहे, हे या रुदालींना कुणीतरी सांगा होऽऽ खुद्द बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हिताचा विचार करून काँग्रेसबरोबर युती केली होती आणि आणीबाणीला पाठिंबा दिला होता, हे सोयीस्करपणे विसरू नका… शिवसेनेने तुम्हाला छोटा भाऊ समजून खांद्यावर उचलून घेतलं आणि तुमचं कमळ हाती घेतलं तर आनंद होत होता, आता कानात लघुशंका करायचा प्रयत्न कराल तर मशालीचे चटके सहन करावे लागतीलच ना! १९८४-८५ सालात बाळासाहेबांच्याच कुंचल्याने हे भविष्य वर्तवलेलं आहे, हे त्यांच्या नकली अनुयायांनी लक्षात घ्यावं आणि आता सामानसुमानही बांधायला घ्यावं…