• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

चलो जिंदगी को मोहब्बत बना दें..

- समीर गायकवाड (लव्ह बॉलिवुड)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 31, 2023
in मनोरंजन
0

रात्र गडद होत गेल्यावर चित्रा सिंग आपल्या शयनकक्षातले दिवे मालवतात. म्लान उजेडाच्या साथीने तिथे अंधार वसतीस येतो. चित्रांना आता वेध असतात रात्रीतून तिथे सुरु होणार्‍या मैफलीचे. आस्ते कदम तिथे मंच उभा राहतो, प्रेक्षक जमा होतात, पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसलेले जगजीत सिंग अवतीर्ण होतात. रात्र जशी सरत जाते तसतशा गझलांच्या एकामागून एक मैफली सजतात. लोक आनंद घेत राहतात. टाळ्यांचा गजर होत राहतो. ‘वन्समोअर’चे पुकारे होत राहतात, वीणा झंकारत राहते. मधूनच भानावर येणार्‍या चित्रा डोळ्यांच्या कडा पुसत दीर्घ नि:श्वास सोडतात. उत्तररात्रीच्या अखेरच्या प्रहरी थकलेल्या चित्रा त्यांच्या नकळत डोळे मिटून शांतपणे झोपी जातात. तेंव्हा फुलांनी सजलेला मंच अदृश्य होतो, टाळ्या वाजवणारे रसिक श्रोते लुप्त होतात. एक नीरव शांतता पसरते आणि खांद्यावर मखमली किरमिजी रंगाची शाल पांघरलेले, पांढर्‍या शुभ्र वस्त्रातले जगजीतजी जवळ जाऊन त्यांच्या कोमल म्लान चेहर्‍यावरून थरथरता हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा उष्म अश्रूंचा थेंब चित्रांच्या गाली पडायच्या आधी अदृश्य होतात. शीतल वार्‍याच्या झुळुकेने जाग यावी तद्वत चित्रा जाग्या होतात. एकवार डोळे उघडतात आणि किंचित मंद स्मित करत पुन्हा झोपी जातात.
अलीकडील काळात हेच त्यांचं आयुष्य झालेलं आहे. आता त्यांनी आयुष्यालाच प्रेमाचं रूप दिलंय. प्रेम करण्यासाठी देहरुपाचीच निकड असते असं काही नाही, आपलं प्रेम पराकोटीचं दृढ असेल तर ईश्वराचा देखील विसर पडतो आणि आयुष्यच प्रेम होऊन जातं, मग कुठलंच संकट उरत नाही… ‘हर इक मोड पर हम गमों को सजा दें’चा अर्थ इतका भावपूर्ण आहे! कितीही संकटं आली तरी जगणं सुंदर करता येतं, फक्त तशी इच्छाशक्ती असावी लागते.
आपल्याला एखाद्या माणसाची प्रसिद्धी दिसते, कीर्ती दिसते, नावलौकिक आणि संपत्ती दिसते, मात्र त्याआडचे अपार दु:ख दिसत नाही. अशाच धगधगत्या दु:खात होरपळलेले दांपत्य म्हणजे जगजीत आणि चित्रा सिंग. त्यांच्या वाट्याला आलेली दु:खे कुणाच्याही वाट्याला न येवोत.
जगमोहन सिंग धिमन उर्फ जगजीत सिंग यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ सालचा. तत्कालीन बिकानेर राज्यातील (आताचे राजस्थान) श्रीगंगानगरचा त्यांचा जन्म. भारतीय गझल गायकीत आपल्या अद्भुत आवाजाची छाप पाडली होती. प्रेमाने लोक त्यांना गझलसम्राट म्हणत. त्यांच्या दर्दभर्‍या गायकीचा दिवाना नाही असा संगीत रसिक विरळाच म्हणावा लागेल. बालपणी शीख धर्मगुरूंची वचने गाणार्‍या लहानग्या जगमोहनच्या आवाजातला गोडवा वडिलांनी अचूक ताडला आणि त्याला शास्त्रीय गायनाचं शिक्षण देण्याचं ठरवलं. त्याच्या गोड आवाजाने भारावलेल्या एका जत्थेदाराने ‘त्याचं नाव जगजीत ठेवा’ असं त्याच्या वडिलांना सांगितलं. तेव्हापासून ते जगजीत सिंग याच नावाने ओळखले जातात आणि नावाप्रमाणेच आपल्या सुरेल आवाजाच्या बळावर त्यांनी जग जिंकून दाखवलं. पाच दशकांची संगीत सेवा संपन्न झाल्यावर वयाच्या सत्तराव्या वर्षी १० ऑक्टोबर २०११ रोजी जगजीतसिंग निवर्तले. जगभरात त्यांचे चाहते पसरले आहेत, ज्यांनी आजही त्यांना आपल्या हृदयात अढळस्थान दिलेलं आहे. जगजीत सिंग यांची गझल गायकी आणि त्यांची अद्भुत शैली, श्रोत्यांवर गारुड करणारा तरल अल्वार आवाज यावर अनेकांनी लिहिलं आहे. त्यांच्यातल्या अद्भुत प्रतिभेस अनेकांनी कुर्निसात केला आहे. त्यांच्या गझला आजही मोठ्या तन्मयतेने ऐकल्या जातात. आयुष्यभरात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनमोल गायकीने त्यांना अफाट प्रसिद्धी दिली, नावलौकिक दिला, समृद्धी दिली, यश दिलं आणि संपत्तीही दिली, मात्र त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंदाची पखरण करताना नियतीने हात आखडता घेतला.
आताच्या बांगलादेशात जन्मलेल्या चित्रा सिंग या आधीच्या चित्रा दत्ता होत. देबोप्रसाद दत्ता हे त्यांचे पहिले पती. १९५७च्या आसपास त्यांचा विवाह झाला. १९५९मध्ये या दांपत्यास एक कन्यारत्न झाले. मोठ्या हौसेने त्यांनी तिचे नामकरण केले. मोनिका तिचे नाव. या नंतरच्या वर्षात त्यांची ट्युनिंग बिघडू लागली, दांपत्यजीवनाची वीण उसवू लागली. १९६८मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आर्थिक तंगीसोबतच वैयक्तिक आवडीनिवडी यांच्यामुळे हे मतभेद वाढत गेले होते. त्याची परिणती विभक्त होण्यात झाली. ‘बियॉन्ड टाइम – द एजलेस म्युझिक ऑफ जगजित सिंग’ या फोटोबायोग्राफीत एका प्रसंगात चित्रा सिंग यांनी एक अत्यंत भावुक क्षण नोंदवलाय. त्या लिहितात, ‘मोनिका वीस दिवसांची तान्ही पोर होती. तिला पाळण्यात घालून अंगाई गीत गाण्याऐवजी मी माईक हाती धरून तयार होते, त्या दिवशी गायलं नसतं तर तिच्या-माझ्या पोटापाण्याचा प्रश्न होता. पैशासाठी मला हे करावं लागलं. माफ कर पोरी!’ किती कळवळून गेला असेल ना त्यांचा जीव! विभक्त झाल्यानंतर आपल्या हिंमतीवर त्यांनी मुलीस सांभाळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांची ओळख जगजीतजींशी झाली.दोघांना एकमेकांचा स्वभाव आवडला, आवडी निवडी तर सारख्या होत्याच, पण विचारही आवडले. जगजीत सिंग भले माणूस होते. त्यांनी देबोप्रसाद दत्ता यांची भेट घेऊन आपली मनीषा त्यांच्या कानावर घालण्याचे ठरवले आणि ते त्यांना भेटले देखील. ‘मी तुमच्या एक्स वाईफसोबत लग्न करू इच्छितो,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याही आधी त्यांनी चित्रा यांचा होकार मिळवला होता. १९६९मध्ये त्यांनी विवाह केला. या वेळी चित्रांच्या मुलीचे म्हणजे मोनिकाचे वय दहा वर्षांचे होते. म्हणजे तिला बर्‍यापैकी समज आलेली होती. जगजीतजींनी तिला मुलीचे प्रेम दिले आणि आपलंसं केलं.
जगजीत सिंग मुंबईत शिफ्ट झाले ते साल असावे १९६५चे. गाण्याचे कार्यक्रमही वाढत होते आणि सातत्याने रेकॉर्डिंगला मुंबईला यावे लागत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आणि याच निर्णयामुळे त्यांच्या आयुष्याला आणखी एक कलाटणी मिळाली, त्यांना लाईफ पार्टनर मिळाला. एका जाहिरातीच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने जगजीत आणि चित्रा पहिल्यांदा भेटले तेव्हा चित्रांनी जगजीतसोबत गाण्यास नकार देत कमेंट केली होती की जगजीतजींचा आवाज खूपच हेवी आहे आणि उभयतांचे आवाज मॅचही होत नाहीत व कॉम्बिनेशन नीट होत नाही. पण चित्रांचा अंदाज चुकीचा होता हे नियतीने दाखवून दिले. नंतर या दोघांनी जेव्हा एकत्रित गायला सुरुवात केली तेव्हा रसिकांनी या ड्युओला अक्षरश: डोक्यावर घेतले होते. यांचे अनेक अल्बम हिट झाले. त्यातल्या अनेक रचना आजही मोठ्या प्रमाणात ऐकल्या जातात. या दांपत्याचं वैवाहिक जीवन आणि सांगीतिक जीवन अगदी सुखैनैव चालू होते. सगळं सुरळीत होतं. १९७१मध्ये त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. विवेक सिंग! त्याच्या बाललीला पाहत आणि त्याच्यावर कोणतंही दडपण न आणता त्यांनी आपली सुरेल सफर जारी ठेवली होती. मात्र नियतीला हे सुख पाहवले नसावे.
१९९१मध्ये वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सडक अपघातात विवेकचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. जगजीत आणि चित्रासाठी हा मोठा धक्का होता. या दांपत्याला हे एकच अपत्य होते, नियतीने तेही हिरावून नेल्याने ते इतके खचले की एक वर्षभर त्यांनी गायन बंद केले. हळुहळू काळाने त्यांच्या जखमेवर फुंकर घातली आणि काही कालावधीनंतर जगजीत सिंग पुन्हा मैफलींची शान वाढवताना दिसू लागले. जगजीतना हे शक्य झाले कारण संगीत हा त्यांचा आत्मा होता. मात्र चित्रा यांना मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का पचवता आला नाही. त्यांनी विवेक गेल्यापासून कधीच गायन केलं नाही; जणू त्यांचा आवाजच हरपला!
जगजीत विवेकला लाडाने बब्बू म्हणत. विवेकचा जन्म झाल्यावर त्यांचे विचार काहीसे असे होते – ‘That was the height of happiness. We were not well-off then, but I felt as if I was the richest man in the world.’ लाडका बब्बू गेल्यावर मात्र ते स्वत:बद्दल लिहितात – ‘I was a broken man.’ या काळात जगजीत आणि चित्रा यांच्यातलं नातं अत्यंत हळवं राहिलं.
३१ ऑक्टोबर २०१२ रोजी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत चित्रांनी याचा अलवार उल्लेख केला आहे. त्या म्हणतात, विवेक झाला तेव्हा मी त्याला सांगायचे की, ‘जाओ पापा का बुलाओ…’ मग चिमुरडा विवेक दुडूदुडू धावत जाऊन वडिलांना आईचा निरोप द्यायचा, मग ते बापलेक चित्रांच्या समोर हजर होत. पण विवेक गेल्यानंतर जगजीत हेच चित्रांचे अपत्य झाले, त्यांच्यातले नाते इथे मायलेकासारखे झाले होते. ते चित्रांना अनेकदा मम्मी पुकारायचे. परस्परांना समजून घेण्याचं सत्व या दोघांत किती खोलवर रुजलं होतं याचं हे अप्रतिम उदाहरण ठरावं. चित्रा स्थिर झाल्या, पण सावरू शकल्या नाहीत, कारण नियती त्यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत होती.
हा धक्का मोनिकाचा होता. मोनिका एक साजिरी गोजिरी तरुणी होती. जगजीतनी तिच्यात आणि विवेकमध्ये कधीही अंतर राखले नाही. दोघांना सारखंच प्रेम दिलं. जगजीत सिंगांबद्दल बोलताना मोनिकाचं प्रेम उतू जाई. आईवरही तिचा अपार जीव होता. वरकरणी आनंदी, अवखळ असणारी मोनिका खूपच संवेदनशील आणि विचारी होती. याच कारणामुळे आयुष्याचा जोडीदार शोधायला तिला थोडा वेळ लागला. १९८८ साली, वयाच्या २९व्या वर्षी तिने व्यवसायाने सिनेमॅटोग्राफर असणार्‍या जहांगीर चौधरीशी निकाह केला. १९९१मध्ये त्याच्यापासून तिला मुलगा झाला, अरमान त्याचं नाव! याच वर्षी बब्बूच्या निधनाने कोसळून गेलेल्या जगजीत-चित्रा दांपत्यास आजोबा-आजी झाल्याचं सुख काही नीट अनुभवता आले नाही. चार वर्षांनी मोनिकाला उमर हा दुसरा मुलगा झाला, दरम्यान तिच्या पतीचं कामकाज थंडं पडत गेलं, त्यांच्यात मतभेद वाढत गेले.
पुत्रवियोगाने शोकाकुल झालेल्या आईवडिलांना आपल्यामुळे आणखी दुःख द्यायला नको या हेतूने तिने तरीही हे नातं बळेच ओढत नेलं. पण एक वेळ अशी आली की त्याच्यासोबत आणखी निभावून नेणं अशक्य झालं. अखेर तिने त्याच्यापासून तलाक घेतला. २००५मध्ये हे दोघे विभक्त झाले. दोन मुलं घेऊन तिने नव्याने डाव मांडण्याची तयारी सुरु केली, पण इथे ती आणखीनच फसली. २००५ मध्येच तिने विक्रोळीस्थित ब्रिटिश उद्योजक मार्क ह्युटन रॉजर अटकिन्स यांच्याशी विवाह केला. पण तिच्या नशिबाचे फासे उलटे पडले होते. या माणसाने तिला पराकोटीचा त्रास दिला. २००७मध्ये तिला पोलीस चौकी गाठावी लागली. पतीने केलेल्या छळवादाची रीतसर तक्रार तिने पोलिसांत दिली. पोलिसी कारवाईचा वेळकाढूपणा नवर्‍याच्या पथ्यावर पडला. २००८च्या प्रारंभास तो देश सोडून परागंदा झाला.
मोनिका अंधाराच्या खाईत लोटली गेली. जहांगीरसोबतच्या लग्नाआधी मॉडेलिंग करणार्‍या मोनिकाचे विचार स्वावलंबी होते, पण आता आपलं ओझं आईवडिलांवर पडणार या विचाराने तिला ग्रासलं. ती डिप्रेशनमध्ये गेली आणि त्यातच तिने अविवेकी निर्णय घेतला. २९ मे २००९च्या शुक्रवारी तिने बांद्र्याच्या पेरी क्रॉस रोड स्थित राहत्या घरात बाथरूममध्ये स्वत:ला संपवलं. ३० मेच्या सकाळी चित्रा मुलीच्या घरी गेल्या तेव्हा हा प्रकार उघड झाला. हे पाहताना त्यांना काय यातना झाल्या असतील, याला शब्द कमी पडावेत!
या घटनेने चित्रा सिंग पुरत्या जमीनदोस्त झाल्या, पण जगजीत सिंग यांचं असीम प्रेम त्यांचं जगणं थोडं फार का होईना सुकर करत होतं. पण नियतीला कदाचित हेही पाहवलं नाही. तिने चित्रा यांची अखेरची परीक्षा घेण्याचं ठरवलं.
घटस्फोटातून पहिल्या पतीपासून मुक्ती मिळवत नवा सुखाचा डाव मांडण्यासाठी चित्रा यांना नियतीची जी साथ लाभली होती ती त्यांच्या मुलीला मोनिकाला लाभली नाही. उलट तिचं नवजीवनाचं गणित चुकलं आणि ती पुरती उन्मळून पडली. या धक्क्याने गलितगात्र झालेल्या चित्रा यांना सावरताना कुठेतरी जगजीत यांनाही नियतीच्या या सुडान्वेशी नियतीचा तिटकारा आला असावा आणि त्यांनी तिला टक्कर देतानाच पत्नीला पुरतं सावरण्यासाठी कंबर कसली. स्टेज शोंचे प्रमाण जाणवण्याइतपत घटवले आणि घराकडे अधिक लक्ष दिले. आता त्यांच्या संसारवेलीवर कोणतेच फुल नव्हते, कधी काळी हिरवी कोवळी असलेली तजेलदार पानं आता सुकण्याच्या बेतात आली होती. काळ हळूहळू पंजा कसत असतो, माणूस मात्र आपल्याच विश्वात जगत असतो. जगजीत वरवर सुखी असल्याचा आविर्भाव करत होते, पण त्यांना आता चित्रांची काळजी लागून राहिली होती. त्याचा ताण त्यांच्यावर पडत गेला.
२०११मध्ये त्यांनी इंग्लंडचा संगीत दौरा केला. तिथून परतल्यावर काही दिवसांनी मुंबईत गुलाम अलींच्या गझला ते परफॉर्म करणार होते. मात्र हे होणे नव्हते. २३ सप्टेबरला अतिरक्तदाबामुळे जगजीतसिंग यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि त्यातच ते कोमात गेले. तब्बल दोन आठवडे ते कोमात होते. हे चौदा दिवस ते मृत्यूच्या दारात उभे होते.
त्यांना तिथून परतायचे होते, तर त्या विश्वनियंत्याला त्यांच्या स्वरांची मैफल सजवायची होती. तो त्यांना ऐकायला उत्सुक होता, त्यांना माघारी फिरण्याची अनुमती तो देत नव्हता. जीवन मृत्यूची ही कश्मकश कुरूक्षेत्रावरील लढाईपेक्षा कमी नव्हती, यात अखेर जगजीत हरले आणि तो विश्वाचा निर्मिक जिंकला. या चौदा दिवसात चित्रा सिंग यांची मानसिक अवस्था काय झाली असेल याचा विचार करवत नाही. एका मागोमाग जीवाची माणसं सोडून जाताहेत आणि आता काळजाचा तुकडा मृत्यूच्या अंथरुणाला खिळून आहे, तो जागा होईल की नाही याची कसलीच शाश्वती नाही! हे दिवस खूपच त्यांना जड गेले असतील! प्रत्येक क्षण एकेका वर्षासारखा गेला असणार. पण चित्रा म्हणतात, ‘या चौदा दिवसांनी मला आणखी जगण्याची उर्मी दिली. कदाचित माझ्यात जगण्याच्या ऊर्मीची प्रेरणा यावी म्हणूनच जगजीतजींनी हा जीवनसंघर्ष केला असावा.’
जगजीतजी गेले तेव्हा चित्रांनीही नुकतीच सत्तरी पार केली होती. गात्रे थकली होती, एकेक करून आयुष्याचे महत्वाचे पडाव मागे गेले होते. आता त्या उरल्या होत्या आणि त्यांचा संधीकाळ!… जगजीतजींना जाऊन आता आठ वर्षे झालीत. चित्रा आता ऐंशीच्या घरात आल्यात, त्यांची नातवंडे मोठी झालीत. त्यांच्या सावलीत त्यांचा दिवस जातो, पण संध्याकाळ होताच त्यांचा आवाज कातर होत जातो. दिवाणखाण्यातील सतार नकळत झंकारु लागते आणि त्यांच्या कानात जगजीतजींचे स्वर गुंजारव करू लागतात. सांज ओसरून रात्र होताच अंधार दाटत जातो, सर्वत्र उदासवाणी शांतता पसरते, चित्रांच्या शयनकक्षात मात्र स्वरांची मैफल सजलेली असते. हजारो श्रोते बसलेले असतात आणि एका सुरेख सजवलेल्या मंचावर चित्रा आणि जगजीत गात असतात – ‘अगर हम कहें और वो मुस्कुरा दें, हम उनके लिए जिंदगानी लुटा दें… हर इक मोड पर हम गमों को सजा दें, चलो जिंदगी को मोहब्बत बना दें…
विवेकच्या मृत्यूनंतर जगजीत सिंग यांनी जेव्हा कमबॅक केलं होतं, त्यावर एक स्वतंत्र प्रकरण ‘बियॉन्ड टाइम – द एजलेस म्युझिक’मध्ये आहे. त्यात त्यांनी निदा फाजलींच्या गझलांचा संदर्भ देत म्हटलंय की, ‘जीवनाचं उद्दिष्ट हरवल्यानंतर माणूस दिशाहीन होऊन जातो आणि त्यातून त्यालाच मार्ग काढायचा असतो, त्याला पथदर्शक कुणी नसतो न कुणी काळजाचा दिवा घेऊन अंत:करणातला प्रकाश पसरवतो; हे तर त्यालाच करावं लागतं, त्यालाच काजवा व्हावं लागतं, त्यालाच चंद्र व्हावं लागतं आणि त्यालाच सूर्य व्हावं लागतं. काळाचं ग्रहण मिटवण्यासाठी त्यालाच जळावं लागतं, हे जळणं एखाद्या ज्वालामुखीहून धगधगतं असतं, यात एखाद्या दीपस्तंभासारखं स्थिर राहत अविरतपणे कतरा कतरा जळत राहावं लागतं…’ हे सर्व एक इंट्यूशन असावं जे जगजीतजींनी चित्रांच्या उर्वरित आयुष्याला प्रकाशवाटा दाखवण्यासाठी लिहिलं असावं.
नियती कुणाबरोबर कोणता डाव खेळेल हे कुणी सांगू शकत नाही. आता जो क्षण आपण जगतोय तेच जीवन होय. त्यात आनंद भरणे हे आपलं काम. सर्वच लोकांना हे सहजसाध्य होत नाही. काहींना आयुष्यभर संघर्ष करावा लागत्ाो तर काहींच्या आयुष्यात सुख दुःखाचे इतके हिंदोळे येऊन जातात की त्यांचं जीवन दोलायमान होऊन जातं. आत्मिक प्रेमाने त्यावर मात करता येते. हे गृहितक या दांपत्याने सार्थ केलं. आपल्या सर्वांच्या आयुष्यातही या प्रकाशवाटा आहेत, आपण आपल्यातच सच्चेपणाने डोकावायचा अवकाश की आपण कितीही संकटात दु:खात असलो तरी आपलं ही जीवन प्रेमाच्या सच्च्या प्रकाशाने उजळून निघेल.
बॉलिवुडमुळे गीतसंगीताचा नि त्यातून गझलांचा नाद लागलेली अनेक माणसं भवताली दिसतील. आपलं जगणं समृद्ध करणार्‍या या मायानगरीवर म्हणून प्रेम केलं पाहिजे!
जगजीत आणि चित्रा यांच्यात प्रेमाचं जे नातं होतं त्याला व्यवहारिक भौतिक जगाचे मापदंड भले लागू होत नसतील वा प्रेमाच्या तथाकथित ऋजुतेतही ते बसत नसेल; पण त्यांचे प्रेम गहिरे होते, आत्मिक पातळीवरचे होते. त्या प्रेमाची वीण इतकी घट्ट होती की अजूनही ती तसूभरही उसवलेली नाही. व्यक्तिश: मला अजूनही वाटते की, ‘कौन आयेगा यहां कोई आया न होगा, मेरा दरवाजा हवाओं ने हिलाया होगा…’ ही गझल या दांपत्याच्या अखेरच्या सफरीसाठीच लिहिली गेली असावी.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

आनंदचा प्रज्ञावान वारसदार

Related Posts

मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
मनोरंजन

रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

April 18, 2025
वन अँड ओन्ली भारत कुमार
मनोरंजन

वन अँड ओन्ली भारत कुमार

April 11, 2025
Next Post

आनंदचा प्रज्ञावान वारसदार

आपण यांना पाहिलंत का?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.