□ पहलगामला एक महिना झाला, दहशतवादी अजूनही मोकाट
■ रक्तातून गरम सिंदूर वाहतो वगैरे भाषणबाजी आणि राजाबाबू छाप उथळ पोस्टरांवर झळकून प्रचार करण्याची सोय तर झाली. निवडणुका जिंकणं आणि मालकांना देश टप्प्याटप्प्याने विकणं हे महत्त्वाचं… दहशतवादी पकडण्याचे इतके फायदे आहेत का?
□ संजय राठोड यांच्या खात्यात पैसे देऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या – भाजप आमदार संदीप जोशी यांचा आरोप
■ यांची एक वेगळीच गंमत असते. हे आपल्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगत नाहीत, तथाकथित भ्रष्ट मंत्र्याला हटवत नाहीत. कृतीतून धडा घालून देत नाहीत. बाहेर बदनाम करतात. ज्यांना बदनाम करतात, त्यांनाच नंतर मांडीवर घेतात, हे काय जनतेला दिसत नाही का?
□ राजस्थान निवडणूक प्रचारात ‘ऑपरेशन सिंदूर’
■ प्रत्येक गोष्ट प्रचारात आलीच पाहिजे. आपल्या प्रचारासाठी नव्वदीतल्या आईला नोटबंदीनंतर रांगेत उभे करणार्या लेकांकडून वेगळी काय अपेक्षा करणार?
□ मोदी म्हणतात, माझ्या धमन्यांत रक्त नाही, गरम सिंदूर वाहतोय
■ सिंदूर म्हणजे कुंकू विषारी असतं आणि ते रक्तात गेलं तर मज्जासंस्था निकामी होते, असं विज्ञान सांगतं. यांच्या धमन्यांमधलं रक्त किंवा सिंदूर किंवा सोयीनुसार जे काही असेल ते चीनचं नाव घेताना थंडगार का पडतं, ते सांगा.
□ मोदी, शहा, फडणवीसांमुळे मंत्री झालो – भुजबळांचा गौप्यस्फोट
■ असा काय मोठा गौप्यस्फोट आहे हा? सूर्य, चंद्र उगवतात-मावळतात तेही याच तिघांमुळे, विश्वाचा सगळा कारभार याच तिघांनी पेलला आहे, त्यात कोणा एका भ्रष्टाचाराच्या आरोपी माणसाला मंत्रिमंडळात घेतलं जाणं ही किती किरकोळ घटना आहे, ती वेगळ्या कुणामुळे घडेल?
□ तुम्ही तर सर्व मर्यादा ओलांडल्या, संविधानाचेही उल्लंघन केलेय – सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले
■ बैल गेला आणि झोपा केला एवढाच या फटकार्यांचा अर्थ. न्यायालय अनेक प्रकरणांची आपणहून दखल घेऊ शकलं असतं, बेकायदा तुरुंगात डांबलेल्यांच्या बाजूने निकाल देत असताना ईडीवर दंड आकारण्यापासून प्रतीकात्मक शिक्षेपर्यंत अनेक गोष्टी करता आल्या असत्या. यांचा उच्छाद हाताबाहेर गेल्यानंतर फटकारून उपयोग काय? निबर कातडीच्या सरकार आणि एजन्सींवर परिणाम तरी होईल का काही?
□ धारावीतील निसर्ग उद्यानाच्या पार्किंगची जागाही अदानीच्या घशात
■ सब भूमी गौतम की हा आजच्या भारताचा नियम आहे. अजून आपण राहतो त्या इमारतींचं, आपल्याच मालकीच्या फ्लॅटचं भाडं अडाणीला भरावं लागत नाही, हे नशीब समजा.
□ चिरकुट पावसातही ठाणे तुंबणार – शिवसेनेने ठाण्यात केली नालेसफाईची पोलखोल
■ जागोजागच्या वाहत्या प्रवाहांमध्ये राजकीय कचराच इतका साठलेला आहे की आता तुंबणारचष्ठ फक्त ठाणे नाही, सगळा महाराष्ट्र. सगळी महत्त्वाची शहरं.
□ पालिकेच्या तिजोरीत खडखडाट, पण एकनाथ शिंदेंच्या दिमतीला ठाणे पालिकेच्या पाच इनोव्हा; भाड्यापोटी दरवर्षी अडीच कोटी
■ अहो, ठाण्याचे भाग्यविधाते आहेत ते. पाचशे इनोव्हा अशाच आणून उभ्या करू शकतात. पाच इनोव्हांचं काय कौतुक सांगताय!
□ डहाणूतील चिकू बागायतदारांचे विम्याचे पैसे सरकारने लटकवले
■ सरकार चिक्कू आहेष्ठ अर्थातच सर्वसामान्य माणसांच्या बाबतीतष्ठ मालकांनी सगळ्या चिक्कूच्या बागा विकत घ्यायची इच्छा व्यक्त करूद्यात, लगेच लोटांगणं घालत सगळ्या गोष्टींची पूर्तता करतील.
□ लाडक्या बहिणींसाठी पुन्हा आदिवासींचे ३३५ कोटी पळवले
■ आदिवासी किती, त्यांची ताकद किती, त्यांच्याकडची मतं किती? बहिणींना भावांनी कितीही मूर्ख बनवलं तरी निवडणुकीच्या तोंडावर खात्यात पैसे जमा झाल्याचा एसेमेस आला की लगेच त्यांना पाझर फुटतो. तो महत्त्वाचा.
□ लिहून देतो, ठाकरे-पवार ब्रँड महाराष्ट्रातून संपणार नाही – राज ठाकरे यांची सडेतोड भूमिका
■ राजसाहेब, तो ब्रँड तुम्ही तुमच्या परीने जपा, शिवसेनाही तो जपते आहेच; महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर ठसलेला ब्रँड आहे तो. गुजरातसेवकांना तो संपवायला सात जन्म घ्यायला लागतील. त्यानंतरही त्यांना गाडून हा ब्रँड तेजाने तळपत राहील.
□ एसटीच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा बंद करण्याचा सरकारचा घाट
■ आता मालक पाने, पक्कड वगैरे घेऊन एसटी दुरुस्त करण्याच्या धंद्यात पण प्रवेश करतायत की काय? जरा दक्षिणेच्या राज्यांमधल्या सरकारी बस सेवा पाहा. थोडी लाज वाटू द्या.
□ निवडणुका नाहीत, नगरसेवक नाही, पालिकेकडे मुंबईकरांच्या १ लाख १५ हजार तक्रारींचा ढीग
■ करत राहा तक्रारी. निवडणूक आली की करा मूर्खासारखं मतदान, घ्या लोकशाहीच्या पायावर कुर्हाड मारून. उपयोग काय त्या तक्रारींचा. सुरनळ्या करा आणि… एकमेकांचे चेहरे निरखत बसा त्यांच्यातून.
□ अलिबागमध्ये मिंधे आमदार महेंद्र दळवींच्या कार्यकर्त्याचा गावातल्या राणे कुटुंबावर हल्ला
■ बीड असो की अलिबाग. सत्ताधार्यांचे कार्यकर्ते म्हणजे छोटे राजेच की आपल्या गल्लीतले. त्यांना सगळं काही करण्याची मुभा आहे. वर आका बसले आहेत सगळं सांभाळून घ्यायला.
□ डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करायला कुणी सांगितले? – राहुल गांधी यांचा एस. जयशंकर यांना सवाल
■ त्यांना विचारून काय उपयोग राहुलजी? त्यांचे परात्पर नॉनबायोलॉजिकल गुरू डोलांडने सांगितलं की माना डोलावतायत, हे हुकमाचे गुलाम, स्वत:ची बुद्धी वापरायची परवानगी आहे का यांना?