• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नया है वह…

- वैभव मांगले (विचारून टाका प्रश्न)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 17, 2022
in नया है वह!
0

‘झुंड’मध्ये संधी मिळाली असती, तर तुम्हाला कुणाची भूमिका करायला आवडली असती?
– जनार्दन शेंडगे, मलकापूर
अमिताभ बच्चन

काही देशांना युद्ध करण्याची खुमखुमी का येते?
– फातिमा शेख, अचलपूर
कारण कोरोना काम करू देईना आणि रशिया जेऊ देईना ही म्हण प्रचलित व्हावी म्हणून

‘होळी’ आणि ‘धुळवड’ तुम्ही कशी साजरी करता?
– यशवंत महाजन, कणकवली
दोन्हीतला फरक कळला तर नक्की कळवेन

तुम्ही एका वेळेला किती पुरणपोळ्या खाऊ शकता?
– रामदेव शाह, सांगली
बायकोला पुरणपोळ्या करता येत नाहीत

एखाद्या व्यक्तिरेखेसाठी धोतर नेसण्याची वेळ आली, तर काय काळजी घेता?
– बबन पाटील, बेळगाव
कासोटा नीट बांधतो

श्रीमंत माणसांचीही पैशाची हाव संपत का नाही?
– सायली कुलकर्णी, येरवडा, पुणे
अजून मिळू शकतो हे कळल्यावर कुणी का थांबेल?

अनेक बिनशिकलेली किंवा अगदी कमी शिकलेली माणसे समाजात नाव मिळवून जातात. मग शिक्षणाचा उपयोग काय?
– विनायक रानडे, वसई
शालेय शिक्षणाचा खरंच काही उपयोग होत नाही आपल्याकडे

स्त्रियांना मंगळसूत्रासारखे लग्न झाल्याचे ‘लायसन’ असते तसे पुरुषांना का नसते?
– तुषार साळवी, अकोला
कारण शील बायकांनी जपण्याची गोष्ट आहे हे थोतांड आपल्या ढोंगी समाजाने रूढ केल्यामुळे

घटस्फोटांचे प्रमाण आताच बेसुमार का वाढत चालले आहे?
– यामिनी सुरवसे, इस्लामपूर
कारण बायका पैसे कमावतात

भारताला जगातील आदर्श देश बनविण्यासाठी नेमके काय करावे लागेल?
– उल्हास घाटे, अक्कलकोट
सगळे सोशल मीडिया बंद करून टाकावेत… आणि घाम गाळायला लावलं पाहिजे

दहा पुरुष एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकतात. पण त्यापेक्षा कमी स्त्रिया गुण्यागोविंदाने एकत्र का राहात नाहीत?
– शेखर काजरोळकर, भोईवाडा
कुचाळक्या थांबवत नाहीत

सोशल मीडियावर ट्रोल लोकांचा त्रास तुम्हाला कधी झाला आहे का? काय उपाय केला तुम्ही?
– श्रेणिक पाटील, सातारा
होय, पण तेच आहे शेणात दगड मारला की जे होणार ते होणारच…

हापूस आंबा इतका गोड कसा असतो?
– जनार्दन गोसावी, अमळनेर
अरे हो… खरंच की… असे प्रश्न पडत नाहीत लोकांना म्हणून भारत मागे राहिलाय.

नवर्‍या मुलाची वरात घोड्यावरून का काढतात?
– भावना बागल, काळा चौकी
घोडा नाही घोडी… गाईला आपल्यात देव मानतात म्हणून…

बायकोपेक्षा मेव्हणी बरी म्हणणारे लग्न ठरवताना तिलाच का नाही पसंत करत?
– गणेश मांढरे, वसई
कारण थोरलीच्या वेळी तिला लपवतात… आणि तसंही आपल्या ताटात पडलंय ते कधीच गोड लागत नाही…

Previous Post

रशिया-युक्रेनचा झुंड

Next Post

खोट्याच्या कपाळी गोटा!

Next Post

खोट्याच्या कपाळी गोटा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.