• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय, नो, नेव्हर…

- संतोष पवार

Nitin Phanse by Nitin Phanse
January 31, 2025
in भाष्य
0

माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. मी माझ्या मित्राच्या हातून तिला किती तरी पत्रं पाठवली, भेटवस्तू पाठवल्या. पण शेवटी तिने त्या मित्राशीच लग्न केलं हो!
– प्रवीण कारखानीस, रहिमतपूर
नशिबाचे आभार माना की असा मित्र तुम्हाला लाभला. आता ती पत्रं आणि त्या भेटवस्तू मित्राकडून लवकर परत घ्या… ‘तिला’ जर कळलं ना की त्या वस्तू, ती पत्र, तिला पाठवणारे तुम्ही होता, तर ती तुमच्या गळ्यात पडायची… तेव्हा उगाच गळा काढू नका… तिने ‘शेवटी’ मित्राशी लग्न केलं असलं तरी सुरुवात तुमच्याबरोबर केली होती यात समाधान माना. त्या ‘सुरुवातीच्या’ आंबट गोड आठवणी तुमच्या ‘शेवटा’पर्यंत पुरवून पुरवून वापरा.

मुंबईत जागोजागी इतकं खणून ठेवलंय, इतके खड्डे करून ठेवले आहेत महानगरपालिकेने. या महानगराच्या खाली महामंदिरांचं महासंकुल वगैरे दडलेलं आहे काय? तुमचा काय अंदाज?
– पल्लवी मेहंदळे, दादर
या खड्ड्यांमध्ये ‘मोहमाया’ मातेचे मंदिर दडलेल आहे… बिचार्‍या प्रत्यक्ष खड्डे खणणार्‍यांना सांगितलं जातं मोहमाया सब झूट आहे… त्यामुळे ते निर्विकारपणे खड्डे खणतात.. पण जे खड्डे खणायला सांगतात त्यांच्यावरच ही मोहमाया प्रसन्न होते. मग ती कोणाच्या तिजोरीत डायरेक्ट जाऊन बसते… कोणाला खोक्याच्या स्वरूपात भेटते, कोणाच्या ड्रायव्हरच्या अकाउंटला जाऊन वसते… कोणाच्या पीएकडे… (असा आमचा अंदाज आहे. तुम्ही विचारलंत म्हणून तो आम्ही लावला) आता अजून विस्कटून सांगायला नका लावू ताई!

तुम्हाला कधी मिळणार पद्मभूषण, संतोषराव? किमान पद्मश्री तरी?
– बबन शेळके, नांदापूर
हे असे पुरस्कार कोणालाही देतात का? तुमच्या प्रश्नावरून असं वाटलं म्हणून विचारलं… हे असे प्रश्न तुम्ही विचारता, त्याच्यावर आम्ही काही उत्तर दिलं आणि पद्म देणारे जर चिडले रागावले, तर आम्हाला कोण कसं ‘देणार’ पद्मभूषण किंवा पद्मश्री?… (ज्यांना पुरस्कार ‘मिळाले’ आहेत, त्यांचा आदर राखून उत्तर दिलेलं आहे. ज्यांना पुरस्कार ‘दिलेले’ आहेत किंवा ज्यांनी मिळवले आहेत त्यांचा काय राखावा, हे त्यांच्यावर टीका करणार्‍यांनाच विचारावं लागेल…)

मोदीजींसारखा नेता जगात नाही आणि भारत हा जगातला विश्वगुरू आहे, असं सतत सांगणारे अमेरिकेतले अनिवासी भारतीय लोक आता ट्रम्पने हाकलून काढायला सुरुवात केल्यावर घाबरले का आहेत? अमृतकाळातलं अमृतप्राशन करायला ते भारतात रांग लावून का येत नाहीयेत?
– सुलभा कानविंदे, सातारा
अहो मेड इन यूएसए आणि मेड इन भारत या वस्तूंपैकी तुमचा कुठल्या गोष्टीवर विश्वास आहे? मेड इन यूएसए गोष्टी पचणार्‍यांना, ‘आताचा भारत हा नवीन भारत आहे,’ असं ‘त्यांच्या देवाने’ सांगितलं तरी ते त्यांना पचत नसेल… आणि तुम्ही ‘तुमच्या देवाची’ शपथ घेऊन सांगा, तुमचं भारतात निवांत अमृतप्राशन चालू असताना, आता त्यात बाहेरची लोकं वाटेकरी होणार म्हणून तुम्हीच घाबरलायत? (नोट- तुम्ही प्रश्नात ‘कोणाचं नाव’ घेतलं असलं, तरी आम्ही उत्तरात ‘कोणाचंही’ नाव घेतलेले नाही. ‘उगाच अमृतावरच्या प्रश्नाला उत्तर देताना विषाची परीक्षा का घ्या?’)

जगात सगळ्यांना चिंता आहे ती एआय हुशार होत चालला आहे याची. मानवजात मठ्ठ होत चालली आहे, याची चिंता कोणीच का करत नाही?
– सायमन डिसूझा, सांताक्रूझ
मिस्टर डिसूझा, आपको ये क्यू नही सुझा, की गायची चिंता करणारी डोकी आता एआयची चिंता करायला लागलीयत. एआयमध्येच आपली आय-माय आहे असं सांगणार्‍यांच्या बोलण्यावर डुलणारी डोकी तुम्हाला मठ्ठ वाटतात? आम्हाला तर तुमच्याच डोक्याची चिंता वाटतेय… (आपल्यापेक्षा दुसरा कोणी हुशार असू नये असं फक्त महामानवालाच वाटतं, असं तुम्हाला वाटतं? सामान्य मानवालाही असं वाटत हे समजून घ्या.)

ज्यांचं एकमेकांवर खरं प्रेम असतं, ते लोक एकमेकांशी लग्न करून एकमेकांच्या आणि स्वत:च्या आयुष्याचा सत्यानाश का करतात?
– विक्रम सावंत, पालघर
निसर्गाचा नियमच आहे, काहीतरी नवीन जन्माला येण्यासाठी जुनं नाश पावावंच लागतं… तुम्ही ज्याला सत्यानाश म्हणताय तो सत्यानाश होणं सुद्धा नवीन जीव जन्माला येण्यासाठी आवश्यक असतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सत्यानाश न करता नवीन जीव जन्माला घातला, तर नवीन जीव ‘जन्माला आला हो’ म्हणून बोंब पण मारता येत नाही. बोंब मारली तर समाजाकडून तुमचा सत्यानाश अटळ असतो… अशावेळी माणसाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? (तुमचं वाटणं तुमच्याकडेच ठेवा, जगाला सांगू नका… लोकं तसंच करतील, लग्नसंस्कृतीचा सत्यानाश होईल… आणि जगाचा सत्यानाश झाला तरी चालेल पण संस्कृती टिकली पाहिजे… असं आम्हाला वाटतं (सध्याचं वातावरण पाहता).

Previous Post

बहिणी जाणार सुप्रीम कोर्टात?

Next Post

उल्लू बनाया के नहीं? बोलो, बनाया के नहीं?

Next Post

उल्लू बनाया के नहीं? बोलो, बनाया के नहीं?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.